शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:35 IST

राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली.

ठळक मुद्देभारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी आहे. याठिकाणी विविध भाषा, धर्माचे लोक राहतातहिंदू धर्म फक्त भाजपाची मक्तेदारी आहे का? त्यांनी पेटेंट घेतले आहे का?माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता

भोपाळ – संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला २०० जणांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात काँग्रेसचे नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणचं स्वागत करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

कमलनाथ यांनी सांगितलं की, प्रभू राम सर्वांचे आहे, आता आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जर यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच भारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी आहे. याठिकाणी विविध भाषा, धर्माचे लोक राहतात. ही आपली ओळख आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा भाजपाच्या पोटात का दुखू लागते माहिती नाही. हिंदू धर्म फक्त भाजपाची मक्तेदारी आहे का? त्यांनी पेटेंट घेतले आहे का? भाजपाची धर्माची संस्था चालवतंय का? असा सवाल कमलानाथ यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत मी स्वत: छिंदवाडा येथे हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. आमच्या सरकारच्या काळात गोशाळा बनवण्यात आल्या. महाकाल, ओंकारेश्वर मंदिर विकास योजना बनवण्यात आली असं ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असंही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाcongressकाँग्रेस