शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:35 IST

राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली.

ठळक मुद्देभारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी आहे. याठिकाणी विविध भाषा, धर्माचे लोक राहतातहिंदू धर्म फक्त भाजपाची मक्तेदारी आहे का? त्यांनी पेटेंट घेतले आहे का?माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता

भोपाळ – संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला २०० जणांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात काँग्रेसचे नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणचं स्वागत करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

कमलनाथ यांनी सांगितलं की, प्रभू राम सर्वांचे आहे, आता आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जर यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच भारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी आहे. याठिकाणी विविध भाषा, धर्माचे लोक राहतात. ही आपली ओळख आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा भाजपाच्या पोटात का दुखू लागते माहिती नाही. हिंदू धर्म फक्त भाजपाची मक्तेदारी आहे का? त्यांनी पेटेंट घेतले आहे का? भाजपाची धर्माची संस्था चालवतंय का? असा सवाल कमलानाथ यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत मी स्वत: छिंदवाडा येथे हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. आमच्या सरकारच्या काळात गोशाळा बनवण्यात आल्या. महाकाल, ओंकारेश्वर मंदिर विकास योजना बनवण्यात आली असं ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असंही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाcongressकाँग्रेस