शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

"यांना शक्य झालं तर संसदही विकतील"; काँग्रेस नेत्याची अर्थसंकल्पावरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:08 IST

नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका, एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयास असल्याच्याही विरोधकांची टीका

ठळक मुद्देसोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्पसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी डिजिटल पद्धतीने सादर केला. प्रथमच अर्थमंत्री सीतारमन यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची सुटकेस नव्हती तर लॅपटॉप होता. अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, कोरोना लसीकरण, मेट्रो प्रकल्प, जलजीवन मिशन अशा योजनांवर भर दिला आहे. मात्र सर्वसामान्यांनाची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामीण उद्योग, रोजगार, शिक्षण अशा बाबी दुर्लक्षित झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलवर अधिभार, नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका आणि एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा हा प्रयास असल्याच्याही टीका विरोधकांकडून होत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्रावर निशाणा साधला आहे."हा देशाचा अर्थसंकल्प आए की OLX ची जाहिरात. यांना शक्य झालं तर हे संसददेखील विकतील," असं म्हणत भाई जगताप यांनी केंद्र सकरावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. यावेळी त्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरूनही केंद्रावर टीकेचा बाण सोडला. "एकीकडे पेट्रोल डिझेल वरची एक्ससाईज ड्युटी कमी केली आणि दुसरीकडे दुसरीकडे तेव्हढाच पेट्रोलवर २.५० रुपये आणि डिझेल ४.०० रुपये कृषी सेस लावला. ६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय, हाच का तो विकास?," असा सवालही त्यांनी केला. चिदंबरम यांच्याकडूनही टीका अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सीतारामन यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर देत टोला लगावला. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट ३६ प्रमाणे होती, असं म्हणत टोला लगावला.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Parliamentसंसदcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापTwitterट्विटरchidambaram-pcचिदंबरमbankबँकLIC - Life Insurance Corporationएलआयसी