शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय - सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 13:12 IST

 कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली.

नवी दिल्लीकर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकारने भाजपच्या काळातील निर्णय बदलून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. अशातच बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी अमित शहा यांना सांगितले आहे की गरिबांसाठी असलेल्या योजनेसाठी राज्याला तांदूळ पुरवताना द्वेषाचे राजकारण होऊ नये.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री शहा यांची भेट घेतली आणि राज्याच्या 'अन्न भाग्य' योजनेसाठी तांदूळ पुरवठ्याबाबत चर्चा केली. या योजनेच्या माध्यमातून बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त ५ किलो तांदूळ मिळणार आहेत. सिद्धरामय्या म्हणाले, "मी काल रात्री अमित शहांना भेटलो. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की एफसीआयने तांदूळ पुरवठा करण्यास सहमती दर्शवली होती आणि या संदर्भात पत्र देखील लिहिले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांनी सांगितले की, ते पुरवठा करू शकणार नाहीत. इथे राजकारण खेळले गेल्याचे दिसते. गरिबांना तांदूळ देण्याचा कार्यक्रम असल्याने यात द्वेषाचे राजकारण होता कामा नये."

१ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजनेला प्रारंभ नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या आणि त्यांचे मंत्री मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर 'अन्न महामंडळा'कडून राज्याला आवश्यक प्रमाणात तांदूळ मिळू नये यासाठी कट रचला गेला असल्याचा आरोप करत आहेत. पण कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीsiddaramaiahसिद्धरामय्याAmit Shahअमित शाहKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस