शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय - सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 13:12 IST

 कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली.

नवी दिल्लीकर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकारने भाजपच्या काळातील निर्णय बदलून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. अशातच बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी अमित शहा यांना सांगितले आहे की गरिबांसाठी असलेल्या योजनेसाठी राज्याला तांदूळ पुरवताना द्वेषाचे राजकारण होऊ नये.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री शहा यांची भेट घेतली आणि राज्याच्या 'अन्न भाग्य' योजनेसाठी तांदूळ पुरवठ्याबाबत चर्चा केली. या योजनेच्या माध्यमातून बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त ५ किलो तांदूळ मिळणार आहेत. सिद्धरामय्या म्हणाले, "मी काल रात्री अमित शहांना भेटलो. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की एफसीआयने तांदूळ पुरवठा करण्यास सहमती दर्शवली होती आणि या संदर्भात पत्र देखील लिहिले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांनी सांगितले की, ते पुरवठा करू शकणार नाहीत. इथे राजकारण खेळले गेल्याचे दिसते. गरिबांना तांदूळ देण्याचा कार्यक्रम असल्याने यात द्वेषाचे राजकारण होता कामा नये."

१ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजनेला प्रारंभ नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या आणि त्यांचे मंत्री मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर 'अन्न महामंडळा'कडून राज्याला आवश्यक प्रमाणात तांदूळ मिळू नये यासाठी कट रचला गेला असल्याचा आरोप करत आहेत. पण कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीsiddaramaiahसिद्धरामय्याAmit Shahअमित शाहKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस