शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका

By देवेश फडके | Published: February 14, 2021 3:04 PM

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देमाजी संरक्षण मंत्र्यांचा मोदी सरकारवर निशाणामोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नाही - अँटनीमोदी सरकारची चीनसमोर शरणागती - अँटनी

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. (congress leader ak antony criticized modi government over india china border dispute)

एके अँटनी (ak antony) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. लडाखमधील भारत आणि चीन सीमेवरून सैन्य माघारी बोलावणे हे शरणागती पत्करल्यासारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले आहे, असा आरोप अँटनी यांनी केला.

संरक्षण बजेटला कात्री

देशाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही बाजूंच्या आव्हांना भारत तोंड देत आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे विस्तारवादी धोरणामुळे चीन लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सैन्य तैनात करत आहेत. असे असताना संरक्षण बजेटला कात्री लावण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षांत संरक्षण बजेट कमी करण्यात आले आहे. भारतीय सैन्याशी केलेली ही फसवणूक आहे, असा दावा अँटनी यांनी केला. 

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

चीनसमोर शरणागती

भारतीय जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर-८ पर्यंत पेट्रोलिंग करत होते आणि चिनी सैन्य फिंगर-४ पर्यंत पेट्रोलिंग करत होते. यामधील भूभाग वादग्रस्त होता. यानंतर आम्ही कैलाश रेंजवरून माघार घेतली. भारतीय लष्कराची छावणी फिंगर ४ मध्ये असूनही आपण फिंगर ३ पर्यंतच पेट्रोलिंग करू शकतो. ही बाब चीनसमोर शरणागती पत्करल्यासारखी आहे, असा दावा अँटनी यांनी केला. पंतप्रधान मोदी सरकारने यासाठी काय पाऊले उचलली, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. राहुल गांधी म्हणाले की, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण