शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

“संसद घुसखोरीवर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावेच, अन्यथा कामकाज होणार नाही”; काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 22:06 IST

Lok Sabha Security Breach Parliament Attack: गृहमंत्र्यांनी संसदेबाहेर बोलण्यापेक्षा दोन्ही सभागृहात येऊन उत्तरे द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसद सुरक्षेत झालेल्या त्रुटीबाबत जोपर्यंत गृहमंत्री निवेदन देत नाहीत, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालेल असे वाटत नाही. संसदेचे कामकाज चालावे आणि त्यात सहभागी व्हायचे आहे, हे आम्हालाही हवे आहे. मात्र, संसदेतील घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री निवेदन देण्यापासून पळ काढत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, त्यांनी संसदेबाहेर या घटनेबद्दल मीडियाशी संवाद साधला. परंतु सभागृहातील प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. हल्लेखोरांना पास देणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांची भूमिका काय? असा सवाल करत, विरोधी पक्षांची सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली. 

गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात येऊन उत्तर द्यायलाच हवे

गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात येऊन उत्तर द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी जयराम रमेश यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे चार दिवस कामकाज होणार आहे. जे प्रश्न उपस्थित केले जातील, त्यावरही स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना विरोधकांच्या मागणीबाबत माहिती दिली आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले. तसेच राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातून खासदारांना निलंबित केले, त्यांची काय चूक होती. हे सर्व खासदार संसदेत झालेली घुसखोरी आणि सुरक्षेतील त्रुटी याबाबत गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, हीच मागणी करत होते. गृहमंत्री अहंकारी आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

दरम्यान, संसद घुसखोरीबाबत दोन ते तीन तासांत चर्चा होईल. या चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, एवढीच विरोधकांची मागणी आहे. यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरळीत सुरू राहील, असे जयराम रमेश म्हणाले.  

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह