शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

“भाजपाचे ऑपरेशन फेल, राज्यपाल PMO च्या इशाऱ्यावर काम करतायत”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 20:15 IST

Congress Vs BJP: भाजपाचे झारखंडमधील योजना आणि सगळे ऑपरेशन फेल गेले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Congress Vs BJP: हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले, असे सांगत काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे.

झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात होता. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले आहे. आता आमचे युतीचे सरकार उर्वरित एक वर्ष आरामात पूर्ण करेल. यानंतर आमच्या कामाची माहिती देऊन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवू. राज्यपाल पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.

सोरेन सरकार बहुमत मिळवेल, याचा विश्वास होता

चंपई सोरेन सरकार बहुमत मिळवेल, यावर आमचा विश्वास होता. आम्हाला ४७ आमदारांचा पाठिंबा होता, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. मात्र, भाजपा ऑपरेशन अयशस्वी झाले. भाजपाने आधी हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर चंपई सोरेन यांच्या शपथविधीला उशीर केला. मात्र, भाजपाची संपूर्ण योजना फसली, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. जयराम रमेश यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका केली. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत. तामिळनाडू, केरळ, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि बिहारमधील राज्यपाल पंतप्रधान मोदींचे कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंड