शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपाचे ऑपरेशन फेल, राज्यपाल PMO च्या इशाऱ्यावर काम करतायत”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 20:15 IST

Congress Vs BJP: भाजपाचे झारखंडमधील योजना आणि सगळे ऑपरेशन फेल गेले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Congress Vs BJP: हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले, असे सांगत काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे.

झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात होता. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले आहे. आता आमचे युतीचे सरकार उर्वरित एक वर्ष आरामात पूर्ण करेल. यानंतर आमच्या कामाची माहिती देऊन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवू. राज्यपाल पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.

सोरेन सरकार बहुमत मिळवेल, याचा विश्वास होता

चंपई सोरेन सरकार बहुमत मिळवेल, यावर आमचा विश्वास होता. आम्हाला ४७ आमदारांचा पाठिंबा होता, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. मात्र, भाजपा ऑपरेशन अयशस्वी झाले. भाजपाने आधी हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर चंपई सोरेन यांच्या शपथविधीला उशीर केला. मात्र, भाजपाची संपूर्ण योजना फसली, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. जयराम रमेश यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका केली. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत. तामिळनाडू, केरळ, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि बिहारमधील राज्यपाल पंतप्रधान मोदींचे कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंड