शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:52 IST

Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर भारताने दिले.  यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. यातच राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. याला भाजपाने प्रत्युत्तर दिले. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक महिला उलटला. परंतु, या कटात सामील असलेले दहशतवादी सापडले नसल्याबाबत काँग्रेसने केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे.

राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे, चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकला नसता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, आंबे कोणी पाठवले 

पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली, जिन्ना यांना क्लीन चिट कोणी दिली, लालकृष्ण अडवाणींनी दिली. जिन्ना यांची प्रशंसा कोणी केली, जसवंत सिंह यांनी केली. लाहोर बस कोणी सुरू केला, अटल बिहारी वाजपेयींनी केला. नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले होते, शाल कोणी पाठवली होती, नरेंद्र मोदींनी पाठवली होती, असा पलटवार जयराम रमेश यांनी केला. 

दहशतवादी पकडले गेले नाहीत, त्यांना अटक करा

आम्ही इकडे कागदपत्रे तयार करत आहोत; पण, दहशतवादी तिथे फिरत आहेत. दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना अटक करा. दहशतवादी कुठे आहेत? एक महिना उलटणार आहे. त्यांच्याबद्दल माहिती कुठे आहे? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली, असा दावा जयराम रमेश यांनी केला. 

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगाला माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ हे केवळ पंतप्रधान मोदी यांचा यावरून लक्ष विचलित करण्याचा आणि जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक