शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:52 IST

Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर भारताने दिले.  यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. यातच राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. याला भाजपाने प्रत्युत्तर दिले. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक महिला उलटला. परंतु, या कटात सामील असलेले दहशतवादी सापडले नसल्याबाबत काँग्रेसने केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे.

राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे, चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकला नसता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, आंबे कोणी पाठवले 

पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली, जिन्ना यांना क्लीन चिट कोणी दिली, लालकृष्ण अडवाणींनी दिली. जिन्ना यांची प्रशंसा कोणी केली, जसवंत सिंह यांनी केली. लाहोर बस कोणी सुरू केला, अटल बिहारी वाजपेयींनी केला. नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले होते, शाल कोणी पाठवली होती, नरेंद्र मोदींनी पाठवली होती, असा पलटवार जयराम रमेश यांनी केला. 

दहशतवादी पकडले गेले नाहीत, त्यांना अटक करा

आम्ही इकडे कागदपत्रे तयार करत आहोत; पण, दहशतवादी तिथे फिरत आहेत. दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना अटक करा. दहशतवादी कुठे आहेत? एक महिना उलटणार आहे. त्यांच्याबद्दल माहिती कुठे आहे? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली, असा दावा जयराम रमेश यांनी केला. 

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगाला माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ हे केवळ पंतप्रधान मोदी यांचा यावरून लक्ष विचलित करण्याचा आणि जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक