शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 21:19 IST

Shashi Tharoor News: दहशतवादाविरोधात देशाची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दहशतवादाविरोधातील भारत सरकारची भूमिका जगासमोर स्पष्टपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रमुख देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचेशशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जेव्हा देशाला माझी गरज असेल, तेव्हा मी नेहमी उपलब्ध असेन, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या शिष्टमंडळांपैकी एकाचं नेतृत्व शशी थरूर करणार आहेत.

याबाबत शशी थरूर म्हणाले की, माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला माझी पात्रता आणि माझ्यामधील वैगुण्यांबाबत बोलण्याचा हक्क आहे. त्याबाबत मी फार काही बोलणार नाही. माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तिचा मी सन्मान करतो. तसेच ही जबाबदारी मी माझ्या दीर्घ कारकीर्दीमध्ये माझ्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण केली आहे. मग ती जबाबदारी संयुक्त राष्ट्रांमधील असो वा काँग्रेस पक्षामधील असो, ती पूर्ण केली आहे.

शशी थरूर यांनी पुढे सांगितले की, विविध मुद्द्यांवर सोमवारी आणि मंगळवारी आमच्या संसदीय स्थायी समितीची बैठक आहे. दोन दिवसांपूर्वी या शिष्टमंडळाबाबत मला एक फोन आला होता. त्याची माहिती मी पक्षाला दिली होती. संसदीय कार्य मंत्र्यांना मी विरोधी पक्षांच्या नेतृत्वाशी बोलण्यास सांगितलं होतं. त्यावर त्यांनी आपण संवास साधू असं सांगितलं होतं. हे शिष्टमंडळ मला फार उपयुक्त वाटलं. देशाने असा महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकजूट झालं पाहिजे, असे आवाहानही त्यांनी केलं. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारOperation Sindoorऑपरेशन सिंदूर