शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:34 IST

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ही यात्रा नागपूर येथे झाली. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. तर, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींकडून देशातील लोकशाहीची मोडतोड केली जातेय, अशी टीका शिंदे यांनी केली. 

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत मोदी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहे. तसेच, विरोधकांकडून निवडणूक आयोग व न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच, सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली असून मोदींकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राहुल गांधीच लोकशाहीची मोडतोड करत असल्याचं म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने न्यायपालिकेवर दबाव टाकण्याच्या आणि धमकीच्या विचारधारेचं समर्थन केलंय. आपल्या व्यक्तिगत कायदेशीर लढाईली लोकशाहीची लढाई असल्याचे सांगत प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरुन, एक गोष्ट निश्चितच स्पष्ट होते की, काँगेस पक्षच या देशात लोकशाहीची मोडतोड करण्यात कुठलीही कमी ठेवत नाही, असा गंभीर आरोप ज्योतिरादित्य शिंदेंनी केलाय.  

नितीन गडकरींचाही राहुल गांधींवर निशाणा

"वीर सावरकरांचा अपमान केल्याने त्यांची उंची कमी झाली नाही, तर त्यांना घरोघरी जाण्याची संधी दिली. सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभार मानतो. राहुल गांधींनी ते पुढे चालू ठेवावे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

फडणवीस यांनीही केला पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली."राहुल गांधी म्हणतात की मी माफी मागणार नाही, ते सावरकर नाहीत. तुम्ही सावरकर किंवा गांधीही होऊ शकत नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान कारागृहात त्यांना खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. पूर्ण अंधार होता. त्यांना त्यांची रोजची कामेही तिथं करायला लावली होती. राहुल गांधी, एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एसी देऊ, पण तुम्हाला राहता येणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRahul Gandhiराहुल गांधी