शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:34 IST

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ही यात्रा नागपूर येथे झाली. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. तर, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींकडून देशातील लोकशाहीची मोडतोड केली जातेय, अशी टीका शिंदे यांनी केली. 

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत मोदी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहे. तसेच, विरोधकांकडून निवडणूक आयोग व न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच, सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली असून मोदींकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राहुल गांधीच लोकशाहीची मोडतोड करत असल्याचं म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने न्यायपालिकेवर दबाव टाकण्याच्या आणि धमकीच्या विचारधारेचं समर्थन केलंय. आपल्या व्यक्तिगत कायदेशीर लढाईली लोकशाहीची लढाई असल्याचे सांगत प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरुन, एक गोष्ट निश्चितच स्पष्ट होते की, काँगेस पक्षच या देशात लोकशाहीची मोडतोड करण्यात कुठलीही कमी ठेवत नाही, असा गंभीर आरोप ज्योतिरादित्य शिंदेंनी केलाय.  

नितीन गडकरींचाही राहुल गांधींवर निशाणा

"वीर सावरकरांचा अपमान केल्याने त्यांची उंची कमी झाली नाही, तर त्यांना घरोघरी जाण्याची संधी दिली. सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभार मानतो. राहुल गांधींनी ते पुढे चालू ठेवावे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

फडणवीस यांनीही केला पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली."राहुल गांधी म्हणतात की मी माफी मागणार नाही, ते सावरकर नाहीत. तुम्ही सावरकर किंवा गांधीही होऊ शकत नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान कारागृहात त्यांना खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. पूर्ण अंधार होता. त्यांना त्यांची रोजची कामेही तिथं करायला लावली होती. राहुल गांधी, एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एसी देऊ, पण तुम्हाला राहता येणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRahul Gandhiराहुल गांधी