शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:34 IST

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ही यात्रा नागपूर येथे झाली. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. तर, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींकडून देशातील लोकशाहीची मोडतोड केली जातेय, अशी टीका शिंदे यांनी केली. 

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत मोदी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहे. तसेच, विरोधकांकडून निवडणूक आयोग व न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच, सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली असून मोदींकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राहुल गांधीच लोकशाहीची मोडतोड करत असल्याचं म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने न्यायपालिकेवर दबाव टाकण्याच्या आणि धमकीच्या विचारधारेचं समर्थन केलंय. आपल्या व्यक्तिगत कायदेशीर लढाईली लोकशाहीची लढाई असल्याचे सांगत प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरुन, एक गोष्ट निश्चितच स्पष्ट होते की, काँगेस पक्षच या देशात लोकशाहीची मोडतोड करण्यात कुठलीही कमी ठेवत नाही, असा गंभीर आरोप ज्योतिरादित्य शिंदेंनी केलाय.  

नितीन गडकरींचाही राहुल गांधींवर निशाणा

"वीर सावरकरांचा अपमान केल्याने त्यांची उंची कमी झाली नाही, तर त्यांना घरोघरी जाण्याची संधी दिली. सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभार मानतो. राहुल गांधींनी ते पुढे चालू ठेवावे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

फडणवीस यांनीही केला पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली."राहुल गांधी म्हणतात की मी माफी मागणार नाही, ते सावरकर नाहीत. तुम्ही सावरकर किंवा गांधीही होऊ शकत नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान कारागृहात त्यांना खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. पूर्ण अंधार होता. त्यांना त्यांची रोजची कामेही तिथं करायला लावली होती. राहुल गांधी, एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एसी देऊ, पण तुम्हाला राहता येणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRahul Gandhiराहुल गांधी