शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:14 IST

Congress News: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेसला हुरूप आला होता. मात्र नंतर मागच्या सात आठ महिन्यांच्या काळात झालेल्या हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली, तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत खळबळ उडाली असून, पराभवातून धडा घेत पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत बदलांची ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार होती. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षसंघटनेत तातडीने बदल करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांना संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते.  काँग्रेच्या संघटनेमध्ये मुलभूत आणि व्यापक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटनेच्या सरचिटणीसांचं काम तीन भागात विभागलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या तीन भागांसाठी तीन वेगवेगळे सरचिटणीस नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदानंतर सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या पदाची शक्ती कमी होणार आहे. सद्यस्थितीत के. सी. वेणुगोपाल हे या पदावर आहेत. तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असून, ते पक्षसंघटनेतील बलाढ्य नेते मानले जातात. आता या पदाच्या अधिकारांची विभागणी झाल्यास वेणुगोपाल यांची ताकद विभागली जाऊ शकते.

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसकडून सुमारे सहा नवे सरचिटणीस नियुक्त करणार आहे. तर काही जणांना नारळ दिला जाईल.  तसेच बिहार, राजस्थान, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब आणि आसाम या राज्यातील प्रभारी बदलले जाऊ शकतात. तसेच महाराष्ट्र, ओदिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांसह एकूण आठ राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.

सध्या प्रियंका गांधी ह्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही राज्याचा प्रभार नाही आहे. त्यांच्याकडे कुठल्याही मोठ्या राज्याचं प्रभारीपद सोपवलं जाऊ शकतं. बी. के. हरिप्रसाद, सचिन राव, मीनाक्षी नटराजन, श्रीनिवास बी.व्ही, परगट सिंह, अजयकुमार लल्लू, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे