शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:14 IST

Congress News: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेसला हुरूप आला होता. मात्र नंतर मागच्या सात आठ महिन्यांच्या काळात झालेल्या हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली, तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत खळबळ उडाली असून, पराभवातून धडा घेत पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत बदलांची ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार होती. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षसंघटनेत तातडीने बदल करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांना संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते.  काँग्रेच्या संघटनेमध्ये मुलभूत आणि व्यापक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटनेच्या सरचिटणीसांचं काम तीन भागात विभागलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या तीन भागांसाठी तीन वेगवेगळे सरचिटणीस नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदानंतर सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या पदाची शक्ती कमी होणार आहे. सद्यस्थितीत के. सी. वेणुगोपाल हे या पदावर आहेत. तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असून, ते पक्षसंघटनेतील बलाढ्य नेते मानले जातात. आता या पदाच्या अधिकारांची विभागणी झाल्यास वेणुगोपाल यांची ताकद विभागली जाऊ शकते.

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसकडून सुमारे सहा नवे सरचिटणीस नियुक्त करणार आहे. तर काही जणांना नारळ दिला जाईल.  तसेच बिहार, राजस्थान, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब आणि आसाम या राज्यातील प्रभारी बदलले जाऊ शकतात. तसेच महाराष्ट्र, ओदिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांसह एकूण आठ राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.

सध्या प्रियंका गांधी ह्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही राज्याचा प्रभार नाही आहे. त्यांच्याकडे कुठल्याही मोठ्या राज्याचं प्रभारीपद सोपवलं जाऊ शकतं. बी. के. हरिप्रसाद, सचिन राव, मीनाक्षी नटराजन, श्रीनिवास बी.व्ही, परगट सिंह, अजयकुमार लल्लू, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे