शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 19:25 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते.

मागच्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य करत असतात. त्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय, अशी टीका जयशंकर यांनी केली आहे. 

जयशंकर चीनबाबतच्या धोरणाबाबत म्हणाले की, चीनबाबत नरेंद्र मोदी यांची भूमिका ही स्पष्ट राहिलेली आहे. सत्तेत आल्यापासून भाजपा सरकारने एलएसीजवळच्या भागात वेगाने बांधकाम सुरू केलं आहे. आतापर्यंत अनेक रस्ते आणि बोगद्यांचं काम झालं आहे. असं असतानाही काँग्रेकडून चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करतेय, असा आरोप केला जातोय. काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या आक्रमणाबाबत जयशंकर म्हणाले की, चीनने १९५८ आणि १९६२ मध्ये भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता. 

यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही जयशंकर यांनी टीका केली. आपल्याच सुरक्षा दलांवर टीका करणे दु:खद बाब आहे. जेव्हा तुम्ही चीनने जमीन घेतली म्हणता तेव्हा ती १९६२ मध्येच गेली, हे समजून घेतलं पाहिजे. सध्या देशाची दिशाभूल केली जात आहे. सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अधिकच तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिकाधिक सैनिक तैनात केलेल आहे, असे जयशंकर म्हणाले.

चीनकडून सीमारेषेवर गाव वसवले जात असल्याच्या प्रश्नालाही जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. काही लोक म्हणतात की, चिनी लोक सीमेवर गाव वसवत आहेत. मात्र हे बांधकाम लोंगजू येथे होत आहे. त्यावर चीनने १९५९ मध्ये हल्ला करून कब्जा केला होता. मात्र तुम्ही गुगल मॅपवर ते गावा पाहा आणि त्याबाबत १९५९  मध्ये जवाहरलाल नेहरूंनी केलेलं भाषण समजून घ्या. राहुल गांधी लडाखमधील पँगाँग सरोवरात चीनने पूल बांधल्याचे सांगत आहेत. मात्र ते पूल त्या जागी बांधण्यात आलं आहे जिथे १९५८ मध्ये चिनी आले होते. तसेच त्यांनी १९६२ मध्ये त्यावर कब्जा केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेस