शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:20 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

 काँग्रेसकडून आघाडी न झाल्याने आप नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल यांनी टिविट् करत संपुर्ण देश मोदी-शहा यांच्या जोडीला हरविण्यासाठी एकत्र येत असताना अशावेळी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचे काम करून एकप्रकारे काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचे सांगितले. तसेच भाजप-काँग्रेसची छुपी युती झाली असल्याची अफवाही पसरत आहेत असा टोलाही लगावला. दिल्लीत भाजप-काँग्रेसच्या अनैतिक युतीशी लढण्यास आम्ही तयार आहोत, जनताही अशा अनैतिक युतीला हरवणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत स्पष्ट झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठक घेतली या बैठकीत काँग्रेसने दिल्लीत एकला चलो रे चा नारा देत आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला.  

मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपची आघाडीची चर्चा सुरू होती. दिल्लीतील लोकसभेच्या एकूण 7 जागेपैकी प्रत्येकी 3-3 जागा काँग्रेस-आप लढू शकते तर 1 जागा अन्य एकाला दिली जाऊ शकते. अशारितीचा फॉम्युलाही समोर आला होता. मात्र दिल्ली काँग्रेसमध्ये आम आदमी पार्टीशी आघाडीबाबत मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर मंगळवारी दिल्लीतील नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, काँग्रेसचे नेते अजय माकन तसेच दिल्ली काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस दिल्लीत सर्व 7 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले. 

दिल्लीतील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खीळ बसणार हे नक्की.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपाdelhiदिल्लीPoliticsराजकारण