शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हार्दिक पटेल यांच्या अल्टिमेटमला काँग्रेसने दिले उत्तर, पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत घेतली अशी भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:32 IST

पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अहमदाबाद - पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेईल आणि त्यानुसार आपली पुढील वाटचाल ठरवेल, असे त्यांनी म्हटले आहे. पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल यांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेपूर्वी पाटीदारांच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे अल्टिमेटम दिले होते. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत राहून पाटीदारांना कसे आरक्षण देईल. याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी हार्दिक पटेल यांनी केली होती.  त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पाटीदार नेते आणि आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काँग्रेसने आपली भूमिका मांडल्यानंतर पाटीदारांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेत हार्दिक पटेल जाणार नाहीत, असा निर्णय घेतला. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.  गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र भाजपाने विकास आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. तसेच पाटीदार हे पारंपरिक मतदार असून, भाजपालाच मत देतील, असा विश्वास भाजपाचे नेते व्यक्त करत आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल गांधी आणि हार्दिक पटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अपेक्षाही वाढल्या  होत्या. मात्र दरम्यान हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिले होते. हार्दिक पटेलनी काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं सांगितलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.  हार्दिक पटेल यांनी शनिवारी ट्विट केलं आहे. ट्विटरवरुन अल्टिमेटम देताना हार्दिक पटेलने लिहिले होते की, '3/11/2017 पर्यंत काँग्रेसने पाटीदार समाजाला घटनात्मक आरक्षण कसे देणार, यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आपली भूमिका स्पष्ट केली नाहीत तर सुरतमध्ये जे अमित शहांसोबत झालं तसंच तुमच्यासोबत होईल'.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा