शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 19:28 IST

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.भाजपच्या एका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमात मोदी ...

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपच्या एका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे. इंदन वाढले तरीही भाजपने रोजच्या जिवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत. महागाईला नियंत्रमात ठेवले आहे. काँग्रेस सरकार 10 टक्क्यांवर होती, आमच्या सरकारच्या काळात महागाईदर 3-4 टक्क्यांवर आला आहे. 

यावेळी मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ज्या लोकांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना यापूर्वी 18 हजार रुपये कर भरावा लागत होता. आता 5 हजार रुपये भरावा लागत आहे. तसेच भविष्यात आयकर भरण्याचा स्लॅब 10 वरून 5 टक्के करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठ नागरिकांसाठी टॅक्सही कमी करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

मध्यम वर्गाला आपले घर खरेदी करणे कठीण बनत होते. आता ते स्वप्न पुर्ण करणे सोपे झाले आहे. गृह कर्जासाठी पुर्वी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते, आता ते 8.75 टक्क्यांवर आले आहे. यामुळे लोक वर्षाला 35-40 हजार रुपये वाचवत आहेत. तसेच इतरही कर्जे स्वस्त झाली आहेत. महत्वाचा म्हणजे मोबाईल डेटास्वस्त झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले. 

भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी राहुल गांधी यांच्या सरदार वल्लभ भाई पटेलांच्या पुतळ्यावरील वक्यव्याचा समाचार घेतला. काँग्रेस पक्ष खोटे दावे खपविण्यासाठी निर्लज्जपणाचा आधार घेत आहे. काँग्रेसने पटेल यांची आजपर्यंत आठवणही काढली नाही, देश त्यांचा सन्मान करत आहे, तर काँग्रेसला ते चालत नाहीय, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाई