शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन...", काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:21 IST

Congress PC on Agnipath Scheme : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत.

नवी दिल्ली : लष्करातील भरतीबाबत अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) देशात गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. दरम्यान, अग्निपथ योजनेबाबत काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेस नेते प्रमोद तिवारी (Pramod Tiwari), पवन खेरा (Pawan khera) आणि युवा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवर जोरदार टीका केली आहे. अग्निपथ योजना हा नोटाबंदीसारखा निर्णय आहे. विचार न करता धोरणे बनवून पंतप्रधान जनतेसोबत खेळत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा म्हणाले. तसेच, अग्निपथ योजना तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन "नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन बिना डायरेक्शन" असे केले आहे. तसेच, आर्थिक बचतीसाठी तरुणांना शहीद करणार का? असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, आपला हक्क मागणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला जात आहे. ही योजना मागे घ्या. अखेर, किती तरुणांच्या हौतात्म्यानंतर तुम्ही सहमत होणार? असाही सवाल प्रमोद तिवारी यांनी केला.

याचबरोबर, बिहारमधील बेरोजगारीचा दर दुप्पट आहे. तरुणांकडून संधी हिसकावून घेतल्या जात आहेत, असे काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार म्हणाले. तसेच, केंद्र सरकारवर टीका करताना कन्हैया कुमार म्हणाले, पंतप्रधान आम्हा लोकांना पिंजऱ्यात ठेवलेले उंदीर समजतात. हा देश गांधींचा देश आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्कर भरतीच्या आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. यासोबतच, कन्हैया कुमार यांनी तरुणांना हिंसा आणि जाळपोळ न करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, सरकारने ही योजना लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाcongressकाँग्रेस