शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:46 IST

...याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

25 जून, हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य निष्पाप भारतीयांना चुकवावी लागली होती. 1975 साली याच दिवशी देशात आणीबाणी घोषित झाली होती. 25 जून 1975 रोजी लागू झालेली आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत अर्थात 21 महिने चालली. या आणीबाणीला आज ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जशाला तसा जिवंत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

"काँग्रेसनं मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केलं होतं" -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा दिवस त्या सर्व महान पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. काँग्रेसने कशा पद्धतीने आपले मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केले होते आणि प्रत्येक भारतीय ज्या संविधानाचा आदर करतो त्या भारतीय संविधानाची कशी पायमल्ली केली होती, याची आठवण #DarkDaysOfEmergency आम्हाला करून देतो" 

"काँग्रेसनं देशाचा तुरुंग बनवला होता" -पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या पोस्टमोध्ये म्हणतात, "तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेवर टिकून राहण्यासाठी लोकशाही सिद्धांतांना धाब्यावर बसवून देशाचा तुरुंग केला होता. जे कुणी काँग्रेसला विरोध करेल त्याचा छळ केला जात होता. सर्वात कमकुवत वर्गाला निशाणा बनवले जाऊ शकेल, अशी धोरणं तयार करण्यात आली होती. 

"माध्यमांच्या स्वतंत्र्यावर हल्ला" -तिसऱ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानाप्रति प्रेम व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांनी अगणितवेळा कलम 356 लागू केले. माध्यमांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी विधेयक आणले गेले. संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले.

"काँग्रेस संविधानाप्रति असलेला तिरस्कार लपवते" -पंतप्रधान मोदी आपल्या चौथ्या पोस्ट मध्ये म्हणतात, ज्या मानसिकतेने आणीबाणी लादण्यात आली, ती आजही त्या पक्षात जिवंत आहे. एढेच नाही तर, ते त्यांच्या प्रतिकात्मकतेतून संविधानाबद्दलचा अथवा राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार लपवतात. मात्र, भारतीय जनतेने त्यांचे असे वागणे बघितले आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांना वारंवार नाकारले आहे," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस