शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:46 IST

...याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

25 जून, हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य निष्पाप भारतीयांना चुकवावी लागली होती. 1975 साली याच दिवशी देशात आणीबाणी घोषित झाली होती. 25 जून 1975 रोजी लागू झालेली आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत अर्थात 21 महिने चालली. या आणीबाणीला आज ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जशाला तसा जिवंत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

"काँग्रेसनं मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केलं होतं" -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा दिवस त्या सर्व महान पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. काँग्रेसने कशा पद्धतीने आपले मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केले होते आणि प्रत्येक भारतीय ज्या संविधानाचा आदर करतो त्या भारतीय संविधानाची कशी पायमल्ली केली होती, याची आठवण #DarkDaysOfEmergency आम्हाला करून देतो" 

"काँग्रेसनं देशाचा तुरुंग बनवला होता" -पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या पोस्टमोध्ये म्हणतात, "तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेवर टिकून राहण्यासाठी लोकशाही सिद्धांतांना धाब्यावर बसवून देशाचा तुरुंग केला होता. जे कुणी काँग्रेसला विरोध करेल त्याचा छळ केला जात होता. सर्वात कमकुवत वर्गाला निशाणा बनवले जाऊ शकेल, अशी धोरणं तयार करण्यात आली होती. 

"माध्यमांच्या स्वतंत्र्यावर हल्ला" -तिसऱ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानाप्रति प्रेम व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांनी अगणितवेळा कलम 356 लागू केले. माध्यमांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी विधेयक आणले गेले. संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले.

"काँग्रेस संविधानाप्रति असलेला तिरस्कार लपवते" -पंतप्रधान मोदी आपल्या चौथ्या पोस्ट मध्ये म्हणतात, ज्या मानसिकतेने आणीबाणी लादण्यात आली, ती आजही त्या पक्षात जिवंत आहे. एढेच नाही तर, ते त्यांच्या प्रतिकात्मकतेतून संविधानाबद्दलचा अथवा राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार लपवतात. मात्र, भारतीय जनतेने त्यांचे असे वागणे बघितले आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांना वारंवार नाकारले आहे," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस