शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:46 IST

...याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

25 जून, हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य निष्पाप भारतीयांना चुकवावी लागली होती. 1975 साली याच दिवशी देशात आणीबाणी घोषित झाली होती. 25 जून 1975 रोजी लागू झालेली आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत अर्थात 21 महिने चालली. या आणीबाणीला आज ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जशाला तसा जिवंत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

"काँग्रेसनं मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केलं होतं" -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा दिवस त्या सर्व महान पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. काँग्रेसने कशा पद्धतीने आपले मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केले होते आणि प्रत्येक भारतीय ज्या संविधानाचा आदर करतो त्या भारतीय संविधानाची कशी पायमल्ली केली होती, याची आठवण #DarkDaysOfEmergency आम्हाला करून देतो" 

"काँग्रेसनं देशाचा तुरुंग बनवला होता" -पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या पोस्टमोध्ये म्हणतात, "तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेवर टिकून राहण्यासाठी लोकशाही सिद्धांतांना धाब्यावर बसवून देशाचा तुरुंग केला होता. जे कुणी काँग्रेसला विरोध करेल त्याचा छळ केला जात होता. सर्वात कमकुवत वर्गाला निशाणा बनवले जाऊ शकेल, अशी धोरणं तयार करण्यात आली होती. 

"माध्यमांच्या स्वतंत्र्यावर हल्ला" -तिसऱ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानाप्रति प्रेम व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांनी अगणितवेळा कलम 356 लागू केले. माध्यमांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी विधेयक आणले गेले. संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले.

"काँग्रेस संविधानाप्रति असलेला तिरस्कार लपवते" -पंतप्रधान मोदी आपल्या चौथ्या पोस्ट मध्ये म्हणतात, ज्या मानसिकतेने आणीबाणी लादण्यात आली, ती आजही त्या पक्षात जिवंत आहे. एढेच नाही तर, ते त्यांच्या प्रतिकात्मकतेतून संविधानाबद्दलचा अथवा राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार लपवतात. मात्र, भारतीय जनतेने त्यांचे असे वागणे बघितले आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांना वारंवार नाकारले आहे," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस