शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:31 IST

तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर

नवी दिल्ली : पंजाबमध्येकाँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी हस्तक्षेप केला असून तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती गठित केली आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. खरगे यांच्यासह पंजाबचे प्रभारी हररीश रावत आणि दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जे. पी. अग्रवाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी शनिवारी समितीची एक बैठकही घेतली. पंजाबमधील समस्या चर्चेतून सोडविण्यात येईल आणि त्यासाठी एकता हाच मंत्र असल्याचे समितीतील एका सदस्याने लोकमतला सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि बंडखोरी करणारे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह आमदार आणि खासदारांना दिल्लीत बोलाविण्यात येणार आहे. समितीकडून त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील. गटबाजी शमविण्यासाठी पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे किंवा सिद्धू यांना मंत्रिपद देऊन राज्यात क्रमांक दोनचे स्थान देण्याच्या प्रस्तावाबाबत विचारले असता तशी माहिती नसल्याचे जे. पी. अग्रवाल यांनी सांगितले. पंजाबमधील बंडखोरी शमविणे आवश्यकछत्तीसगडनंतर काँग्रेसचे दुसरे स्थिर राज्य आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सत्तांतर झाले होते. तसेच राजस्थानातही अस्थ‍िरता निर्माण झाली आहे. मात्र, पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वादळ शमविणे आवश्यक आहे. ही जाणीव असल्यानेच स्वत: सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये मोठा गट सक्रिय झाला असून एकतेने लढल्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, अशी भीती राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब