शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

काँग्रेस : संसदीय बोर्डाच्या स्थापनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 5:37 AM

कार्यशैलीवर टीका करणाऱ्यांवर कारवाई नाही; पक्ष प्रवक्त्यांचे संकेत

 शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या कार्यशैलीवर जाहीररीत्या हल्ले व टीका करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा मूड नेतृत्वाचा नाही, असे संकेत सोमवारी पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी दिले.  उल्लेखनीय हे आहे की, गेल्या एक आठवड्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम आणि गुलामनबी आझाद यांनी कठोर टीका करून पंचतारांकित संस्कृतीचा उल्लेख करून तळापासून वरपर्यंत निवडणूक घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

आझाद यांना विचारले गेले की, ते १९९८ पासून २०१७ पर्यंत नियुक्त झालेले होते.  तरीही आज निवडणुकीची मागणी का करीत आहात? तेव्हा तुम्ही निवडणूक घेऊन पदे भरण्याचा आग्रह का धरला नाही? आझाद यांच्याकडे याचे थेट उत्तर नव्हते; परंतु त्यांनी नरसिंह राव यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून युक्तिवाद केला की, १९९२ मध्ये मीच संघटनेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे तिरुपती अधिवेशनात निवडणूक घेतली गेली. ‘लोकमत’ने जेव्हा वरिष्ठ नेत्यांकडे या वादाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रुप २३ च्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, वादाचे मूळ राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे नेतृत्व नाही.  पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांच्याबद्दल तक्रार नाही, तर सल्लागारांबद्दल आहे. या सल्लागारांना राजकारण समजत नाही. 

ज्येष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये हवा सहभागया नेत्यांचा इशारा के. राजू, रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपालसारखे नेते पक्ष चालवत आहेत, याकडे होता. त्यांना पंचतारांकित हॉटेलसह विलासाची संसाधने हवीत. आनंद शर्मा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर सही केल्यानंतर मौन आहेत; परंतु अनौपचारिक चर्चेत ते मोकळे बोलतात. 

वरिष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये आपला सहभाग असे वाटते. याच कारणामुळे टीका करणारे नेते सामूहिक नेतृत्वाचा विषय काढतात. त्यांची ही मागणी आहे की, संसदीय बोर्डाची स्थापना आणि कार्य समिती सदस्यांची निवडणूक झाल्यास वाद संपेल.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीNew Delhiनवी दिल्ली