शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 19:30 IST

Congress CWC Meet: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली.

Congress CWC Meet ( Marathi News ): संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढण्याचा सल्ला दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव, खासदारांचे निलंबन यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत, पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढावी. दुसरी भारत जोडो यात्रा पूर्वेकडून पश्चिमकडे असावी, असा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत्यांची तशी मागणी असल्याचे खरगे यांनी नमूद केले. तसेच अंतिम निर्णय राहुल गांधी यांचा असेल, असेही यावेळी स्पष्ट केले.

निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यावर भर दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक फार दूर नाही, त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या  कामांत व्यस्त झाले पाहिजे, अशा सूचना खरगे यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे प्रश्न आपण विसरू नये. जातिनिहाय जनगणना आणि महिला आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि महिलांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखावी लागेल आणि समविचारी पक्षांसोबत काम करून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे खरगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, खासदारांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या घटनात्मक पदांवर असलेले लोक पक्षीय राजकारणाचा भाग म्हणून असे करत आहेत. जात, क्षेत्र आणि व्यवसायाची ढाल करून राजकारण करत आहेत. आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा