शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 19:30 IST

Congress CWC Meet: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली.

Congress CWC Meet ( Marathi News ): संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढण्याचा सल्ला दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव, खासदारांचे निलंबन यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत, पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढावी. दुसरी भारत जोडो यात्रा पूर्वेकडून पश्चिमकडे असावी, असा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत्यांची तशी मागणी असल्याचे खरगे यांनी नमूद केले. तसेच अंतिम निर्णय राहुल गांधी यांचा असेल, असेही यावेळी स्पष्ट केले.

निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यावर भर दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक फार दूर नाही, त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या  कामांत व्यस्त झाले पाहिजे, अशा सूचना खरगे यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे प्रश्न आपण विसरू नये. जातिनिहाय जनगणना आणि महिला आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि महिलांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखावी लागेल आणि समविचारी पक्षांसोबत काम करून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे खरगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, खासदारांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या घटनात्मक पदांवर असलेले लोक पक्षीय राजकारणाचा भाग म्हणून असे करत आहेत. जात, क्षेत्र आणि व्यवसायाची ढाल करून राजकारण करत आहेत. आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा