शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मतांसाठी काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले - अरुण जेटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:36 IST

काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. 

नवी दिल्ली - समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले यावरुन भाजपाने आपले मौन सोडले आहे. काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. 

अरुण जेटली म्हणाले की, हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेलं षडयंत्र आहे. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना युपीए सरकारने या प्रकरणासाठी विलंब लावला गेला. जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले. याची जबाबदारी युपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी असं अरुण जेटली यांनी सांगितले.

तसेच हिंदू दहशत ही थेअरी बनविण्यासाठी चुकीच्या माणसांना पकडण्यात आले. सुनावणीच्यावेळी विविध तर्क सुचवले गेले असा दावाही जेटली यांनी केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चालणारी समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 मध्ये हरयाणा येथे पानीपतजवळ स्फोट झाला. जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण भारताच्या हद्दीतलं शेवटचं स्टेशन होतं. या स्फोटात 68 लोकांचा मृत्यू झाला. 

हिंदूंना दहशतवादी मानणारे लोक आज हिंदू धर्माबद्दल श्रध्दा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण समाजाला दहशतवादी बोलणाऱ्यांना या धर्मातील लोक सहन करणार नाहीत अशी टीका अरुण जेटली यांनी प्रियंका गांधी यांच्यावर केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाMuslimमुस्लीमHinduहिंदूBlastस्फोट