शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:06 IST

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे.नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली.

नवी दिल्ली - कर्नाटकातीलभाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे. नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली आहे. 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी येडियुरप्पा यांच्या डायरीत 1800 कोटींच्या वाटपाचा तपशील आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे सारे चौकीदार चोर असल्याचा आरोप ट्वीटरद्वारे केला. भाजपाने हे आरोप फेटाळून लावले असून, येडियुरप्पा यांनी हा दस्तावेज बनावट असल्याचा दावा केला आहे. एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने हे आरोप केले आहेत. केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार यांच्या घरी घातलेल्या धाडीत आयकर अधिकाऱ्यांना डायरीच्या झेरॉक्स मिळाल्या होत्या, असा दावा केला आहे. 

'कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या तर 24 तासांच्या आत भाजपाचे सरकार'कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. यारागट्टी गावात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी येडियुरप्पा यांनी असं म्हटलं होतं. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनाची लाट आली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक