शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसने अखेरच्या क्षणी बदलला महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 10:06 IST

गांधी कुटुंबाच्या निष्ठावानांना मिळाली उमेदवारी

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यातून हे दिसून येते की, गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यातून पक्षात आणि विशेषतः असंतुष्ट नेत्यांना हा संदेश देण्यात आला आहे की, कुटुंबाप्रती विश्वास ठेवला तर पक्ष आपला विचार करेल. 

बिहारमधून माजी संसद सदस्य रंजिता रंजन, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांना सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचा फायदा झाला आहे. तर, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, सरचिटणीस अजय माकन आणि जयराम रमेश यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचा फायदा झाला. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय उत्तर प्रदेशातील राजीव शुक्ला, प्रमोद तिवारी आणि इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी मिळाली.

मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले

काँग्रेस एका अल्पसंख्याक नेत्याला राज्यसभेत पाठवू इच्छित होती. यात गुलाम नबी आझाद आणि इम्रान प्रतापगढी यांची नावे चर्चेत होती. आझाद यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यावर सहमती झाली होती. अखेर प्रियांका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना फोन करून या निर्णयाला विरोध केला हाेता.

सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्ष अन् लहान पक्षांच्या हाती; घोडेबाजाराला येणार ऊत

पाठिंब्याचे बळ, नाराजीची झळ!

उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसमधून पाठिंब्याचे बळ अन् नाराजीची झळही सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी इम्रान यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर जातात यात नवीन काहीही नाही. आपले मुकुल वासनिक राजस्थानमधून उमेदवार आहेत. इम्रान प्रतापगढी हे तरुण, उत्साही आहेत, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे निवडून आणू, असे दोघांनीही ठामपणे सांगितले. 

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रतापगढी यांची निवड आपल्या आकलनापलीकडची असल्याची टिप्पणी त्यांनी केली. इम्रान यांना उत्तर प्रदेशातून, तर मुकुल वासनिक यांना राजस्थानएवजी महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सोनियाजींनी मला राज्यसभेत पाठविण्याचा शब्द दिला होता. आता त्याला १८ वर्षं झाली. माझ्यात काय उणीव आहे? माझी १८ वर्षांची तपस्या कमी पडली, अशा शब्दांत अभिनेत्री नगमा यांनी इम्रान यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा