शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

काँग्रेसनं 'वंदे मातरम'च्या माध्यमातून देशाचं विभाजन केलं; अमित शहांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 11:02 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाला विभाजित केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे.

नवी दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाचं विभाजन केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.1937मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वीकार केला होता आणि त्याला राष्ट्रीय गीताचा सन्मान देण्याच्याही काँग्रेस तयारीत होता. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काही भागाचा सोयीस्करपणे वापर केला आणि त्यामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसनं तेव्हा ती घोडचूक केली नसती तर आज देश एकसंध राहिला असता, काँग्रेसच्या त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले आणि जातीय पेच निर्माण झाला, असा आरोपही अमित शाहांनी केला आहे. वंदे मातरम् हे पहिल्यांदा कोणत्याही धर्माशी जोडलं गेलेलं नव्हतं आणि आताही नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही. परंतु काँग्रेसनं वंदे मातरमला धर्माशी जोडून नव्या वादाला फोडणी दिली होती. काँग्रेसच्या त्या चुकीमुळेच देशाला विभाजित व्हावं लागलं, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे अमित शाहा पश्चिम बंगालमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहणार असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठीही रणनीती आखणार आहे. अमित शाह दुस-या दिवशी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ येथे जाऊन पूजा-अर्चा करणार आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यात ते भाजपा नेत्यांबरोबर बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते पुरुलियात जाऊन भाजपाच्या हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. याच दरम्यान शाह पुरुलियामध्ये एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेस