शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

काँग्रेसनं 'वंदे मातरम'च्या माध्यमातून देशाचं विभाजन केलं; अमित शहांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 11:02 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाला विभाजित केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे.

नवी दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाचं विभाजन केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.1937मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वीकार केला होता आणि त्याला राष्ट्रीय गीताचा सन्मान देण्याच्याही काँग्रेस तयारीत होता. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काही भागाचा सोयीस्करपणे वापर केला आणि त्यामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसनं तेव्हा ती घोडचूक केली नसती तर आज देश एकसंध राहिला असता, काँग्रेसच्या त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले आणि जातीय पेच निर्माण झाला, असा आरोपही अमित शाहांनी केला आहे. वंदे मातरम् हे पहिल्यांदा कोणत्याही धर्माशी जोडलं गेलेलं नव्हतं आणि आताही नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही. परंतु काँग्रेसनं वंदे मातरमला धर्माशी जोडून नव्या वादाला फोडणी दिली होती. काँग्रेसच्या त्या चुकीमुळेच देशाला विभाजित व्हावं लागलं, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे अमित शाहा पश्चिम बंगालमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहणार असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठीही रणनीती आखणार आहे. अमित शाह दुस-या दिवशी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ येथे जाऊन पूजा-अर्चा करणार आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यात ते भाजपा नेत्यांबरोबर बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते पुरुलियात जाऊन भाजपाच्या हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. याच दरम्यान शाह पुरुलियामध्ये एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेस