शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

काँग्रेसनं 'वंदे मातरम'च्या माध्यमातून देशाचं विभाजन केलं; अमित शहांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 11:02 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाला विभाजित केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे.

नवी दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाचं विभाजन केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.1937मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वीकार केला होता आणि त्याला राष्ट्रीय गीताचा सन्मान देण्याच्याही काँग्रेस तयारीत होता. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काही भागाचा सोयीस्करपणे वापर केला आणि त्यामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसनं तेव्हा ती घोडचूक केली नसती तर आज देश एकसंध राहिला असता, काँग्रेसच्या त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले आणि जातीय पेच निर्माण झाला, असा आरोपही अमित शाहांनी केला आहे. वंदे मातरम् हे पहिल्यांदा कोणत्याही धर्माशी जोडलं गेलेलं नव्हतं आणि आताही नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही. परंतु काँग्रेसनं वंदे मातरमला धर्माशी जोडून नव्या वादाला फोडणी दिली होती. काँग्रेसच्या त्या चुकीमुळेच देशाला विभाजित व्हावं लागलं, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे अमित शाहा पश्चिम बंगालमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहणार असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठीही रणनीती आखणार आहे. अमित शाह दुस-या दिवशी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ येथे जाऊन पूजा-अर्चा करणार आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यात ते भाजपा नेत्यांबरोबर बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते पुरुलियात जाऊन भाजपाच्या हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. याच दरम्यान शाह पुरुलियामध्ये एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेस