शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:25 IST

कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का

बंगळुरू : कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेथील मतदारांनी तेव्हापासून प्रत्येक सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत विरोधी बाकांंवर आणून ठेवले आहे. ही परिस्थिती बदलून दाखवली, तर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सिद्धरामय्या अधिक लोकप्रिय असल्याचे सिद्ध होईल.कर्नाटकात १९८५ पासून किमान ६६ टक्के तर कमाल ७२ टक्के इतके मतदान झाले आहे. मतदानातील वाढीचा फायदा ठराविक पक्षाला झाला, असेही तिथे घडलेले नाही. दक्षिणेकडील कर्नाटक या एकमेव राज्यात भाजपाचे २00८ साली सरकार आले होते. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, रेड्डी बंधूंचे खाण घोटाळे आणि भाजपाअंतर्गत वाद यांमुळे २0१४ साली मतदारांनी काँग्रेसलाच निवडून दिले. या पार्श्वभूमीवर आज झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, हे मंगळवारी मतमोजणीनंतर समजेल.माझा शपथविधी १७ मे रोजी : येडियुरप्पासिद्धरामय्या, येडियुरप्पा व कुमारस्वामी या तिन्ही नेत्यांनी सकाळीच मतदान केले. त्यानंतर बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपाला १५0 जागा मिळतील आणि १७ मे रोजी आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ , असा दावा केला. त्याआधी आपण दिल्लीत नेत्यांना भेटू, असेही ते म्हणाले.काँग्रेसलाच मिळेलबहुमत : सिद्धरामय्याकाँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा आमचेच सरकार येईल, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. येडियुरप्पा यांच्या दाव्याविषयी विचारता ते म्हणाले की, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते असे बोलत असावेत. भाजपाला ६0 ते ६५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाही.मीच होणार मुख्यमंत्री : कुमारस्वामीकुमारस्वामी म्हणाले की, आमचे सरकार येईल आणि मीच मुख्यमंत्री बनेन. जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यालाच माझे प्राधान्य असेल. मुख्य लढत काँग्रेस व भाजपामध्येच असली तरी जनता दल (धर्मनिरपेक्ष) हाही रिंगणातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष किंगमेकर ठरू शकतो.काही बुथवर गोंधळआजच्या मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या जेवण, नाश्ता, तसेच चहापाण्याची काही ठिकाणी व्यवस्था नव्हती. त्यामुळे ते संतप्त झाले होते. उमेदवाराचा प्रतिनिधी हा संबंधित बुथवरील मतदारच असणे आवश्यक आहे, असे अचानक निवडणूक अधिकाºयांनी सकाळी सांगितल्याने सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची धावपळ उडाली. काही ठिकाणी मतदानयंत्रांविषयी तक्रारी होत्या. त्यामुळे मतदानात अडथळे आले.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८