शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:25 IST

कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का

बंगळुरू : कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेथील मतदारांनी तेव्हापासून प्रत्येक सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत विरोधी बाकांंवर आणून ठेवले आहे. ही परिस्थिती बदलून दाखवली, तर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सिद्धरामय्या अधिक लोकप्रिय असल्याचे सिद्ध होईल.कर्नाटकात १९८५ पासून किमान ६६ टक्के तर कमाल ७२ टक्के इतके मतदान झाले आहे. मतदानातील वाढीचा फायदा ठराविक पक्षाला झाला, असेही तिथे घडलेले नाही. दक्षिणेकडील कर्नाटक या एकमेव राज्यात भाजपाचे २00८ साली सरकार आले होते. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, रेड्डी बंधूंचे खाण घोटाळे आणि भाजपाअंतर्गत वाद यांमुळे २0१४ साली मतदारांनी काँग्रेसलाच निवडून दिले. या पार्श्वभूमीवर आज झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, हे मंगळवारी मतमोजणीनंतर समजेल.माझा शपथविधी १७ मे रोजी : येडियुरप्पासिद्धरामय्या, येडियुरप्पा व कुमारस्वामी या तिन्ही नेत्यांनी सकाळीच मतदान केले. त्यानंतर बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपाला १५0 जागा मिळतील आणि १७ मे रोजी आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ , असा दावा केला. त्याआधी आपण दिल्लीत नेत्यांना भेटू, असेही ते म्हणाले.काँग्रेसलाच मिळेलबहुमत : सिद्धरामय्याकाँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा आमचेच सरकार येईल, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. येडियुरप्पा यांच्या दाव्याविषयी विचारता ते म्हणाले की, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते असे बोलत असावेत. भाजपाला ६0 ते ६५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाही.मीच होणार मुख्यमंत्री : कुमारस्वामीकुमारस्वामी म्हणाले की, आमचे सरकार येईल आणि मीच मुख्यमंत्री बनेन. जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यालाच माझे प्राधान्य असेल. मुख्य लढत काँग्रेस व भाजपामध्येच असली तरी जनता दल (धर्मनिरपेक्ष) हाही रिंगणातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष किंगमेकर ठरू शकतो.काही बुथवर गोंधळआजच्या मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या जेवण, नाश्ता, तसेच चहापाण्याची काही ठिकाणी व्यवस्था नव्हती. त्यामुळे ते संतप्त झाले होते. उमेदवाराचा प्रतिनिधी हा संबंधित बुथवरील मतदारच असणे आवश्यक आहे, असे अचानक निवडणूक अधिकाºयांनी सकाळी सांगितल्याने सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची धावपळ उडाली. काही ठिकाणी मतदानयंत्रांविषयी तक्रारी होत्या. त्यामुळे मतदानात अडथळे आले.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८