शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काँग्रेस-भाजपची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:22 IST

हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली.

नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे राष्ट्रीय संकट हाताळण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी’ (एनडीआरएफ) हा वैधानिक निधी असूनही मोदी सरकारने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या ‘पीएम केअर्स’ या धर्मादाय ट्रस्टच्या कायदेशीरपणाला ‘क्लीन चिट’ देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी दिल्यानंतर त्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी जुंपली.काँग्रेसने आणि खास करून राहुल गांधी यांनी ‘पीएम केअर्स’वर सडकून टिका केली असली तरी आज या पक्षाने सत्ताधाऱ्यांना मोकळे रान दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला. हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लोकशाहीमध्ये सत्ताधारी हे ‘बादशहा’ नसतात तर ते मतदार जनतेला उत्तरदायी असतात या संकल्पनेच्या दृष्टीने आजचा दिवस दु:खाचा आहे. ‘स्वच्छ सूर्यप्रकाश हेच सर्वोत्तम जंतुनाशक असते’, असे एरवी आग्रहपूर्वक सांगणाºया सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च बनविलेल्या संदिग्ध आणि संशयास्पद नियमांनुसार काम करणाºया ‘पीएम केअर्स’ला जाब विचारण्याची नामी संधी न्यायालयाने गमावली आहे.सुरजेवाला यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सरकारच्या वतीने मंत्री रविशंकर प्रसाद व भाजपाच्या वतीन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा मैदानात उतरले व त्यांनी ‘पीएम केअर्स’चे जोरदार समर्तन करत असतानाच राहुल गांधींना टिकेचे लक्ष्य केले.कोविड-१९ विरुद्धचा लढा जिंकण्याचा राष्ट्रीय निर्धार दुबळा करण्याची एकही संधी राहुल गांधी यांनी सोडलेली नाही, अशी बोचरी टिका करताना प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींनी ‘पीए केअर्स’ बद्दल जे जे आक्षेप घेतले होते ते सर्व न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. सर्वकायदेशीर बाबींची पूर्तता आणि लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांचा सदुपयोगी विनियोग या दोन्ही बाबतीत या ट्रस्टचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. या निधीचा अपहार किंवा दुरुपयोग केल्याचा एकही आरोप कोणी कधी केलेला नाही. याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ सरकारच्या काळात ‘एनडीआरएफ’ निधीतून राजीव गांधी फौंडेशन या खासगी ट्रस्टला पैसे दिले गेले होते, या जुन्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.भाजपा पक्षाध्यक्ष नड्डा यांनी याच रोखाने टिका करताना राहुल गांधींनीच न्यायालयात ‘भाडोत्री पक्षकार’ उभे केल्याचाही अप्रत्यक्ष आरोप केला. ते म्हणाले की, न्यायालयाचा निकाल ही राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूला सणसणीत चपराक आहे. कुचकटपणे कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे स्वच्छ सूर्यप्रकासारखे जगापुढे येतेच. आता तरी ही विघ्नसंतोषी मंडळी तोंड गप्प ठेवून स्वत:ची आणि आपल्या पक्षाची आणखी नाचक्की करून घेणार नाहीत, अशी कुत्सित अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.>प्रसाद यांनी दिलेला हिशेबहे शरसंधान करीत असतानाच मंत्री प्रसाद यांनी ‘पीएम केअर्स’मधील निधी व त्याचा विनियोग याचा हिशेब दिला तो असा :

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा