शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काँग्रेस-भाजपची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:22 IST

हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली.

नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे राष्ट्रीय संकट हाताळण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी’ (एनडीआरएफ) हा वैधानिक निधी असूनही मोदी सरकारने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या ‘पीएम केअर्स’ या धर्मादाय ट्रस्टच्या कायदेशीरपणाला ‘क्लीन चिट’ देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी दिल्यानंतर त्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी जुंपली.काँग्रेसने आणि खास करून राहुल गांधी यांनी ‘पीएम केअर्स’वर सडकून टिका केली असली तरी आज या पक्षाने सत्ताधाऱ्यांना मोकळे रान दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला. हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लोकशाहीमध्ये सत्ताधारी हे ‘बादशहा’ नसतात तर ते मतदार जनतेला उत्तरदायी असतात या संकल्पनेच्या दृष्टीने आजचा दिवस दु:खाचा आहे. ‘स्वच्छ सूर्यप्रकाश हेच सर्वोत्तम जंतुनाशक असते’, असे एरवी आग्रहपूर्वक सांगणाºया सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च बनविलेल्या संदिग्ध आणि संशयास्पद नियमांनुसार काम करणाºया ‘पीएम केअर्स’ला जाब विचारण्याची नामी संधी न्यायालयाने गमावली आहे.सुरजेवाला यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सरकारच्या वतीने मंत्री रविशंकर प्रसाद व भाजपाच्या वतीन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा मैदानात उतरले व त्यांनी ‘पीएम केअर्स’चे जोरदार समर्तन करत असतानाच राहुल गांधींना टिकेचे लक्ष्य केले.कोविड-१९ विरुद्धचा लढा जिंकण्याचा राष्ट्रीय निर्धार दुबळा करण्याची एकही संधी राहुल गांधी यांनी सोडलेली नाही, अशी बोचरी टिका करताना प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींनी ‘पीए केअर्स’ बद्दल जे जे आक्षेप घेतले होते ते सर्व न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. सर्वकायदेशीर बाबींची पूर्तता आणि लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांचा सदुपयोगी विनियोग या दोन्ही बाबतीत या ट्रस्टचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. या निधीचा अपहार किंवा दुरुपयोग केल्याचा एकही आरोप कोणी कधी केलेला नाही. याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ सरकारच्या काळात ‘एनडीआरएफ’ निधीतून राजीव गांधी फौंडेशन या खासगी ट्रस्टला पैसे दिले गेले होते, या जुन्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.भाजपा पक्षाध्यक्ष नड्डा यांनी याच रोखाने टिका करताना राहुल गांधींनीच न्यायालयात ‘भाडोत्री पक्षकार’ उभे केल्याचाही अप्रत्यक्ष आरोप केला. ते म्हणाले की, न्यायालयाचा निकाल ही राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूला सणसणीत चपराक आहे. कुचकटपणे कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे स्वच्छ सूर्यप्रकासारखे जगापुढे येतेच. आता तरी ही विघ्नसंतोषी मंडळी तोंड गप्प ठेवून स्वत:ची आणि आपल्या पक्षाची आणखी नाचक्की करून घेणार नाहीत, अशी कुत्सित अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.>प्रसाद यांनी दिलेला हिशेबहे शरसंधान करीत असतानाच मंत्री प्रसाद यांनी ‘पीएम केअर्स’मधील निधी व त्याचा विनियोग याचा हिशेब दिला तो असा :

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा