शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:50 IST

'देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले.'

मुंबई:काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पक्ष सोडल्यापासून ते सातत्याने काँग्रेसवर (Congress) टीका करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला मतदान न करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर आता त्यांनी देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याची गंभीर टीका केली आहे. 

जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदारएएनआयशी बोलताना निरुपम म्हणतात, 'काँग्रेसचा सुरुवातीपासूनच फोडा आणि राज्य करा, यावर विश्वास आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले. फाळणीला सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे. आजही त्यांचा नेता भर सभेत लोकांना त्यांची जात विचारतो. लोकांना जाती-धर्मात वाटणे काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यावर आता देशातील लोक नाराज आहेत आणि त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते.'

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कम्युनिस्ट मानसिकतायावेळी निरुपम यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, 'काँग्रेसचा जाहीरनामा कुणीही वाचत नाही. यावेळी त्यांच्या जाहीरनाम्यात कम्युनिस्ट मानसिकतेचा मोठा प्रभाव दिसून येतोय. त्यांनी लोकांची संपत्ती जप्त करुन, त्याचे वाटप केले जाईल, असे म्हटले. एका विशिष्ट धर्मासाठी काँग्रेस इतरांशी भेदभाव करेल. यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात टीका केली होती. मल्लिकार्जुन खर्गेना तर स्मृतिभ्रंश झाला आहे. अशी व्यक्ती आपल्या पंतप्रधानांसारख्या अगदी तंदुरुस्त व्यक्तीसोबत बसून चर्चा कशी करू शकते? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

काँग्रेसला मतदान करु नकादोन दिवसांपूर्वीच, म्हणजेच 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यावेळी संजय निरुपम यांनी देशातील मतदारांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. माध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले होते की, 'मी मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो. काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका. काँग्रेस एक जुनी इमारत आहे, जी जुने आणि थकलेले नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाहीत, तर देशाची परिस्थिती काय बदलणार', अशी टीकाही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा