शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

बिहारनंतर आता उत्तर प्रदेश, इंडिया आघाडीत बिघाडी! सपा निर्णयावर काँग्रेस नाराज; दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:52 IST

INDIA Alliance News: सर्व पर्याय खुले आहेत. काँग्रेस लाचार नाही, असा सांगत समाजवादी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

INDIA Alliance News: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी विरोधकांनी सुरू केलेली इंडिया आघाडीच आता धुळीत मिळते काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. जागावाटपाचा निर्णय न झाल्याने इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, बिहारमध्ये अनुक्रमे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीलाच रामराम करत एनडीएसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या नावाचाही समावेश आहे.  समाजवादी पार्टीने घेतलेल्या या निर्णायवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचेउत्तर प्रदेशमधील प्रभारी महासचिव अविनाश पांडे यांनी समाजवादी पक्षावर टीका करत, काँग्रेस विनम्र आहे पण लाचार नाही, असे सांगत थेट इशारा दिला आहे. 

काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर अविनाश पांडे लखनौमध्ये आले होते. ही यात्रा १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या तयारीचा आढावा अविनाश पांडे यांनी घेतला. काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत. काही लोक काँग्रेसविरुद्ध धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस विनम्र राहू शकते. सहकार्य करू शकते. मात्र, काँग्रेस लाचार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अविनाश पांडे यांनी नमूद केले. तसेच समाजवादी पक्षाने घेतलेला निर्णय पूर्णपणे एकतर्फी  आणि अस्वीकार्य आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्याला ही गोष्ट आवडलेली नाही. एका बाजूला एकत्र बसून चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला परस्पर निर्णय घेऊन काँग्रेसला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा, असेही अविनाश पांडे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, काँग्रेस खुल्या मनाने जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इंडिया आघाडीचे काही नियम आहेत आणि सपा नेते याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. सपा नेत्यांनी घेतलेला निर्णय हास्यापद असून, कदाचित अखिलेश यादव यांनाही या निर्णयाची माहिती नसावी, असा दावा अविनाश पांडे यांनी केला. काँग्रेस पक्षाला असा निर्णय घेणे सहज शक्य होते. मात्र, तसे केले नाही. एकत्रित पुढे जाण्यावर आमचा विश्वास आहे, या शब्दांत सपाने घेतलेल्या निर्णयाचा खरपूस शब्दांत अविनाश पांडे यांनी समाचार घेतला. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश