शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बिहारनंतर आता उत्तर प्रदेश, इंडिया आघाडीत बिघाडी! सपा निर्णयावर काँग्रेस नाराज; दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:52 IST

INDIA Alliance News: सर्व पर्याय खुले आहेत. काँग्रेस लाचार नाही, असा सांगत समाजवादी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

INDIA Alliance News: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी विरोधकांनी सुरू केलेली इंडिया आघाडीच आता धुळीत मिळते काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. जागावाटपाचा निर्णय न झाल्याने इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, बिहारमध्ये अनुक्रमे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीलाच रामराम करत एनडीएसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या नावाचाही समावेश आहे.  समाजवादी पार्टीने घेतलेल्या या निर्णायवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचेउत्तर प्रदेशमधील प्रभारी महासचिव अविनाश पांडे यांनी समाजवादी पक्षावर टीका करत, काँग्रेस विनम्र आहे पण लाचार नाही, असे सांगत थेट इशारा दिला आहे. 

काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर अविनाश पांडे लखनौमध्ये आले होते. ही यात्रा १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या तयारीचा आढावा अविनाश पांडे यांनी घेतला. काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत. काही लोक काँग्रेसविरुद्ध धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस विनम्र राहू शकते. सहकार्य करू शकते. मात्र, काँग्रेस लाचार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अविनाश पांडे यांनी नमूद केले. तसेच समाजवादी पक्षाने घेतलेला निर्णय पूर्णपणे एकतर्फी  आणि अस्वीकार्य आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्याला ही गोष्ट आवडलेली नाही. एका बाजूला एकत्र बसून चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला परस्पर निर्णय घेऊन काँग्रेसला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा, असेही अविनाश पांडे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, काँग्रेस खुल्या मनाने जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इंडिया आघाडीचे काही नियम आहेत आणि सपा नेते याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. सपा नेत्यांनी घेतलेला निर्णय हास्यापद असून, कदाचित अखिलेश यादव यांनाही या निर्णयाची माहिती नसावी, असा दावा अविनाश पांडे यांनी केला. काँग्रेस पक्षाला असा निर्णय घेणे सहज शक्य होते. मात्र, तसे केले नाही. एकत्रित पुढे जाण्यावर आमचा विश्वास आहे, या शब्दांत सपाने घेतलेल्या निर्णयाचा खरपूस शब्दांत अविनाश पांडे यांनी समाचार घेतला. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश