शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Ashok Gehlot : "काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:30 IST

Congress Ashok Gehlot : निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते."

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये त्यांना शंका होती, मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं, मात्र तसं झालं नाही. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस पक्षाचा भाजपाकडून पराभव झाला आहे.

"राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट नव्हती"

निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते. भाजपाच्या विजयामागे खोटा प्रचार हे प्रमुख कारण आहे. भाजपा विकास आणि सरकारी कामावर बोलण्याऐवजी कन्हैया लालच्या मुद्द्यावर खोटं बोलली. हे भाजपाच्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही. निवडणुका खोट्याच्या आधारे लढल्या गेल्या." 

"पराभवाच्या दु:खापेक्षा देशाची जास्त चिंता आहे. लोकशाही धोक्यात आहे." यासोबतच गेहलोत यांनी आपण राजकारणातून ब्रेक घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही स्पष्ट केले असून त्यांनी आपले पुढील लक्ष्यही ठेवले आहे. "मी एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जनतेची सेवा करत राहीन. लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करावी, असं आवाहन मी सर्वांना केलं आहे" असं सांगितलं. 

"मला आशा आहे की भाजपा सरकार..."

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले असून लवकरच सरकार स्थापन होणार आहे. यावर गेहलोत यांनी भाजपाला आवाहन करत भाजपा सरकार जुनी पेन्शन योजना सुरू ठेवेल आणि चिरंजवी योजना 50 लाख रुपयांपर्यंत वाढवेल अशी आशा आहे. सरकारी तिजोरी नेहमीच भरलेली असते, असंही अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा