शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:55 IST

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोपाळ - छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीय. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. जनतेशी संवाद साधताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

'पक्षाला भलेही मतं न मिळो,पण माझी व्हॉटबँक माझ्यासोबत राहो', असेच काहीसे विधान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी करताना दिसले आहेत. राउ येथील काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांनी सोमवारी मॉर्निंग वॉकदरम्यान आपल्या मतदारसंघातील जनतेची भेट घेतली. यावेळेस त्यांनी लोकांना मतं देण्यासाठी आवाहन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. 

(माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह)

पण यावेळेस त्यांनी असेही काही विधान केले की यामुळे पटवारी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.  

तर दुसरीकडे यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी म्हटले की, माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले.  

दरम्यान, आपल्याच नेत्यांच्या विधानांमुळे अडचणी निर्माण होत असल्यानं काँग्रेस चिंतेत आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं विधान काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ''माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही'', असं सिंह म्हणाले होते.  मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांचा चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्या विधानामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकले असते, यामुळे पार्टीकडून  यासंदर्भात कठोर भूमिका स्वीकारण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा