शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:55 IST

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोपाळ - छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीय. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. जनतेशी संवाद साधताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

'पक्षाला भलेही मतं न मिळो,पण माझी व्हॉटबँक माझ्यासोबत राहो', असेच काहीसे विधान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी करताना दिसले आहेत. राउ येथील काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांनी सोमवारी मॉर्निंग वॉकदरम्यान आपल्या मतदारसंघातील जनतेची भेट घेतली. यावेळेस त्यांनी लोकांना मतं देण्यासाठी आवाहन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. 

(माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह)

पण यावेळेस त्यांनी असेही काही विधान केले की यामुळे पटवारी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.  

तर दुसरीकडे यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी म्हटले की, माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले.  

दरम्यान, आपल्याच नेत्यांच्या विधानांमुळे अडचणी निर्माण होत असल्यानं काँग्रेस चिंतेत आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं विधान काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ''माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही'', असं सिंह म्हणाले होते.  मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांचा चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्या विधानामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकले असते, यामुळे पार्टीकडून  यासंदर्भात कठोर भूमिका स्वीकारण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा