शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:39 IST

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे टर्मिनलचे छत कोसळले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

कालपासून दिल्लीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनलचा छत कोसळून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दुर्घटनेसाठी भ्रष्टाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.  कोसळलेला भाग २००९ मध्ये बांधला  असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

IGI विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली विमानतळ, जबलपूर विमानतळावरील गळती, अयोध्येतील पाणी साचणे, राममंदिरातील गळती ते गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत बोलताना म्हणाले की, हे सर्व मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत.

खरगे म्हणाले,'ही काही उदाहरणे मोदीजींचे मोठे दावे आणि भाजपचे 'जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा' उघड करत आहेत. १० मार्च रोजी दिल्ली विमानतळावर T1 चे उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'दुसऱ्या मातीतील माणूस' म्हटले होते. या सगळ्या खोट्या टाळ्या आणि भाषणबाजी निवडणुकीपूर्वी रिबन कापण्यासाठीच करण्यात आली, असा टोलाही मल्लिकार्जुन यांनी लगावला. पीडितांवर बोलताना खरगे म्हणाले की, त्यांना भ्रष्ट, अक्षम आणि स्वार्थी सरकारचा फटका बसला आहे.

अपघातानंतर आयजीआय विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. "सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख आणि जखमींना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तपास अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, कोणाचाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही मंत्री म्हणाले.

भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या टीकेवर बोलताना केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, पडलेल्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलेले नाही, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले ते दुसऱ्या बाजूचे आहे, ते वेगळे आहे. जो आज पडला आहे तो २००९ मध्ये बांधला होता. २००४ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीची सत्ता होती, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा