शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:39 IST

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे टर्मिनलचे छत कोसळले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

कालपासून दिल्लीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनलचा छत कोसळून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दुर्घटनेसाठी भ्रष्टाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.  कोसळलेला भाग २००९ मध्ये बांधला  असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

IGI विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली विमानतळ, जबलपूर विमानतळावरील गळती, अयोध्येतील पाणी साचणे, राममंदिरातील गळती ते गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत बोलताना म्हणाले की, हे सर्व मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत.

खरगे म्हणाले,'ही काही उदाहरणे मोदीजींचे मोठे दावे आणि भाजपचे 'जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा' उघड करत आहेत. १० मार्च रोजी दिल्ली विमानतळावर T1 चे उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'दुसऱ्या मातीतील माणूस' म्हटले होते. या सगळ्या खोट्या टाळ्या आणि भाषणबाजी निवडणुकीपूर्वी रिबन कापण्यासाठीच करण्यात आली, असा टोलाही मल्लिकार्जुन यांनी लगावला. पीडितांवर बोलताना खरगे म्हणाले की, त्यांना भ्रष्ट, अक्षम आणि स्वार्थी सरकारचा फटका बसला आहे.

अपघातानंतर आयजीआय विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. "सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख आणि जखमींना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तपास अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, कोणाचाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही मंत्री म्हणाले.

भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या टीकेवर बोलताना केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, पडलेल्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलेले नाही, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले ते दुसऱ्या बाजूचे आहे, ते वेगळे आहे. जो आज पडला आहे तो २००९ मध्ये बांधला होता. २००४ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीची सत्ता होती, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा