शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:39 IST

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे टर्मिनलचे छत कोसळले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

कालपासून दिल्लीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनलचा छत कोसळून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दुर्घटनेसाठी भ्रष्टाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.  कोसळलेला भाग २००९ मध्ये बांधला  असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

IGI विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली विमानतळ, जबलपूर विमानतळावरील गळती, अयोध्येतील पाणी साचणे, राममंदिरातील गळती ते गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत बोलताना म्हणाले की, हे सर्व मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत.

खरगे म्हणाले,'ही काही उदाहरणे मोदीजींचे मोठे दावे आणि भाजपचे 'जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा' उघड करत आहेत. १० मार्च रोजी दिल्ली विमानतळावर T1 चे उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'दुसऱ्या मातीतील माणूस' म्हटले होते. या सगळ्या खोट्या टाळ्या आणि भाषणबाजी निवडणुकीपूर्वी रिबन कापण्यासाठीच करण्यात आली, असा टोलाही मल्लिकार्जुन यांनी लगावला. पीडितांवर बोलताना खरगे म्हणाले की, त्यांना भ्रष्ट, अक्षम आणि स्वार्थी सरकारचा फटका बसला आहे.

अपघातानंतर आयजीआय विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. "सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख आणि जखमींना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तपास अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, कोणाचाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही मंत्री म्हणाले.

भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या टीकेवर बोलताना केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, पडलेल्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलेले नाही, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले ते दुसऱ्या बाजूचे आहे, ते वेगळे आहे. जो आज पडला आहे तो २००९ मध्ये बांधला होता. २००४ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीची सत्ता होती, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा