शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अभिनंदनचा अर्थच आता बदलेल, पंतप्रधान मोदी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:23 IST

अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतात ही ताकद आहे की, तो डिक्शनरीतील शब्दांचा अर्थ बदलून टाकतो.अभिनंदन या शब्दाचा अर्थच मुळी आमची ताकद असा झाला आहे. विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी रात्री पाकिस्तानातून स्वदेशात परत आले. भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.>संयुक्त राष्ट्रे प्रमुखांकडून स्वागतसंयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांना परत भारतात परत पाठविल्याच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटारेस यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी ही सकारात्मक बाजू कायम ठेवावी आणि चर्चा करावी. जर दोन्ही देश यासाठी तयार झाले तर संयुक्त राष्ट्रे मध्यस्थीसाठी तयार होतील, असेही ते म्हणाले.>विंग कमांडर अभिनंदन आपले आपले घरी स्वागत आहे. राष्ट्राला आपल्या साहसाबद्दल गर्व आहे. आमचे सशस्त्र दल देशातील १३० कोटी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.- पंतप्रधान नरेंद्र मोदी>संरक्षणमंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेटकेंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी भारतात परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची नवी दिल्लीत भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी दाखवलेल्या धाडसावर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. सीतारामन यांनी यावेळी अभिनंदन यांचे कुटुंबीय आणि हॉस्पिटलमधील स्टाफशीही गप्पा मारल्या. अभिनंदन यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याआधी सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या ताब्यात असताना तिथे त्यांच्यासोबत नेमके काय काय घडले, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कशी वागणूक दिली, याची माहिती धनोआ यांना दिली.> दबावात सुटका नाही : कुरेशीइस्लामाबाद : भारतीय पायलट अभिनंदन यांना कोणत्याही दबावात किंवा अगतिकतेमुळे सोडण्यात आले नाही, असे मत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. तथापि, पाकिस्तानचा निर्णय जिनेव्हा करारानुसार असल्याचे भारताने म्हटले आहे. कुरेशी म्हणाले की, आम्ही भारताला हे सांगू इच्छितो की, आम्ही आपले दु:ख वाढवू इच्छित नाही. आपल्या नागरिकांची परिस्थिती दयनीय होऊ नये, शांतता रहावी, असे आम्हाला वाटते. पाकिस्तान भूतकाळात जाऊ इच्छित नाही. जर भूतकाळात गेलोच तर आम्हाला हेही पहावे लागेल की, संसद, पठाणकोट आणि उरीचे हल्ले कसे झाले? ही एक मोठी कहाणी आहे.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक