शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अभिनंदनचा अर्थच आता बदलेल, पंतप्रधान मोदी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:23 IST

अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतात ही ताकद आहे की, तो डिक्शनरीतील शब्दांचा अर्थ बदलून टाकतो.अभिनंदन या शब्दाचा अर्थच मुळी आमची ताकद असा झाला आहे. विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी रात्री पाकिस्तानातून स्वदेशात परत आले. भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.>संयुक्त राष्ट्रे प्रमुखांकडून स्वागतसंयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांना परत भारतात परत पाठविल्याच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटारेस यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी ही सकारात्मक बाजू कायम ठेवावी आणि चर्चा करावी. जर दोन्ही देश यासाठी तयार झाले तर संयुक्त राष्ट्रे मध्यस्थीसाठी तयार होतील, असेही ते म्हणाले.>विंग कमांडर अभिनंदन आपले आपले घरी स्वागत आहे. राष्ट्राला आपल्या साहसाबद्दल गर्व आहे. आमचे सशस्त्र दल देशातील १३० कोटी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.- पंतप्रधान नरेंद्र मोदी>संरक्षणमंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेटकेंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी भारतात परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची नवी दिल्लीत भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी दाखवलेल्या धाडसावर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. सीतारामन यांनी यावेळी अभिनंदन यांचे कुटुंबीय आणि हॉस्पिटलमधील स्टाफशीही गप्पा मारल्या. अभिनंदन यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याआधी सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या ताब्यात असताना तिथे त्यांच्यासोबत नेमके काय काय घडले, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कशी वागणूक दिली, याची माहिती धनोआ यांना दिली.> दबावात सुटका नाही : कुरेशीइस्लामाबाद : भारतीय पायलट अभिनंदन यांना कोणत्याही दबावात किंवा अगतिकतेमुळे सोडण्यात आले नाही, असे मत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. तथापि, पाकिस्तानचा निर्णय जिनेव्हा करारानुसार असल्याचे भारताने म्हटले आहे. कुरेशी म्हणाले की, आम्ही भारताला हे सांगू इच्छितो की, आम्ही आपले दु:ख वाढवू इच्छित नाही. आपल्या नागरिकांची परिस्थिती दयनीय होऊ नये, शांतता रहावी, असे आम्हाला वाटते. पाकिस्तान भूतकाळात जाऊ इच्छित नाही. जर भूतकाळात गेलोच तर आम्हाला हेही पहावे लागेल की, संसद, पठाणकोट आणि उरीचे हल्ले कसे झाले? ही एक मोठी कहाणी आहे.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक