शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदनचा अर्थच आता बदलेल, पंतप्रधान मोदी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:23 IST

अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतात ही ताकद आहे की, तो डिक्शनरीतील शब्दांचा अर्थ बदलून टाकतो.अभिनंदन या शब्दाचा अर्थच मुळी आमची ताकद असा झाला आहे. विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी रात्री पाकिस्तानातून स्वदेशात परत आले. भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.>संयुक्त राष्ट्रे प्रमुखांकडून स्वागतसंयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांना परत भारतात परत पाठविल्याच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटारेस यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी ही सकारात्मक बाजू कायम ठेवावी आणि चर्चा करावी. जर दोन्ही देश यासाठी तयार झाले तर संयुक्त राष्ट्रे मध्यस्थीसाठी तयार होतील, असेही ते म्हणाले.>विंग कमांडर अभिनंदन आपले आपले घरी स्वागत आहे. राष्ट्राला आपल्या साहसाबद्दल गर्व आहे. आमचे सशस्त्र दल देशातील १३० कोटी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.- पंतप्रधान नरेंद्र मोदी>संरक्षणमंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेटकेंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी भारतात परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची नवी दिल्लीत भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी दाखवलेल्या धाडसावर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. सीतारामन यांनी यावेळी अभिनंदन यांचे कुटुंबीय आणि हॉस्पिटलमधील स्टाफशीही गप्पा मारल्या. अभिनंदन यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याआधी सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या ताब्यात असताना तिथे त्यांच्यासोबत नेमके काय काय घडले, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कशी वागणूक दिली, याची माहिती धनोआ यांना दिली.> दबावात सुटका नाही : कुरेशीइस्लामाबाद : भारतीय पायलट अभिनंदन यांना कोणत्याही दबावात किंवा अगतिकतेमुळे सोडण्यात आले नाही, असे मत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. तथापि, पाकिस्तानचा निर्णय जिनेव्हा करारानुसार असल्याचे भारताने म्हटले आहे. कुरेशी म्हणाले की, आम्ही भारताला हे सांगू इच्छितो की, आम्ही आपले दु:ख वाढवू इच्छित नाही. आपल्या नागरिकांची परिस्थिती दयनीय होऊ नये, शांतता रहावी, असे आम्हाला वाटते. पाकिस्तान भूतकाळात जाऊ इच्छित नाही. जर भूतकाळात गेलोच तर आम्हाला हेही पहावे लागेल की, संसद, पठाणकोट आणि उरीचे हल्ले कसे झाले? ही एक मोठी कहाणी आहे.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक