शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

काँग्रेसने ‘त्या’ टीकेनंतर केले नौदलाचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 04:40 IST

नौदल अधिका-यांच्या घरांसाठी एक इंच जागा देणार नसल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर आता काँग्रेसने मात्र पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.

मुंबई : नौदल अधिका-यांच्या घरांसाठी एक इंच जागा देणार नसल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर आता काँग्रेसने मात्र पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.२६/११ रोजी मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास १६६ लोकांचा मृत्यू झाला आणि ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. भारतमातेचे शूरवीर सुपुत्र असलेले लष्करी अधिकारी आणि पोलिसांनी मुंबईच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली. हा दहशतवादी हल्ला समुद्रमार्गे झाला होता. त्यामुळे या मार्गाचा वापर मुंबईवर हल्ला करण्यासाठी पुन्हा होऊ शकतो, हे गुप्तचर विभागाच्या अनेक अहवालांतून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये मुंबई अग्रस्थानी आहे, हेसुद्धा स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षिततेकरिता कोणतीही हयगय होता कामा नये, हे अभिप्रेत असणे साहजिकच आहे. त्यासाठी आपण मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड असेल किंवा तरंगते हॉटेल यासारख्या प्रकल्पांना आक्षेप घेऊन आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो, असे काँग्रेसने पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेकरिता कोणी कितीही मोठा असेल तरी नौदलाने कोणत्याही दबावाखाली येऊ नये हीच भारतीय जनतेची अपेक्षा आपल्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे पत्रात नमूद केले आहे. आपण जिवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत आहात याचा सार्थ अभिमान सर्वांना आहे, असेही सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षातर्फे लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस