शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांचा संभ्रम मिटेना

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना

स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना
पेडणे :
पेडणे तालुक्यातील प्रस्तावित मोपा आंतराष्टीय विमानतळ राजकीय हस्तक्षेपामुळे गाजत आहे. मोपा विमानतळाच्या बाजूने आणि विरोधात असे दोन मतप्रवाह गोव्यात आहेत. शिवाय या प्रकल्पांमुळे गोव्याला खराच लाभ होणार आहे का? अशी शंका आहे. तसेच प्रकल्पामुळे पर्यावरण हानीकडे बोट दाखविणारेही विरोधक आहेत.
पुर्वंजानी राखून ठेवलेल्या जमनीवर आपला उदारनिर्वाह चालतो. ही जागा पुढच्या पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, ही जागा सरकारने संपादीत करून तोंडाचा घास हिरवल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून मिळत आहे.
शेतकरी सीताराम परब यांनी सांगितले, एकाच सर्व्हेतील ७० जणांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. पावसाळ्यात उगवणारा वर्षभरचा चारा विकला तरी सरकारने दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जास्त पैशे मिळतात. त्यामुळे सरकारने योग्य मोबदला द्यावा असे त्यांनी पुढे सांगितले.
कॉग्रेस सरकारने शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच जमिनीना कवडीमोल दर दिला. त्याचा फटका विधानसभा निवडणूकीत पक्षाला बसला. त्यामुळे भाजप सरकारने शेतकर्‍यांना किमान ६०० रूपये प्रतिचौरस मीटर दर द्यावा अशी मागणी माजी जिल्हापंचायत अध्यक्ष पांडुरंग परब यांनी केली आहे.
पेडणे तालुक्यातील मोपा, वारखंड, चांदेल, कासारवर्णे, उगवे, अमेरे या भागातील जमिनी विमानतळासाठी गेल्या आहेत. मोपा, सडा व कासरवर्णे सड्यावर एकूण १३ धनगरांची घरे आहेत. ही घरे विमानतळामुळे स्थलांतरित करावी लागणार आहेत. सरकराने आपल्याला विश्वासात घेतले नाही. तसेच घर स्थलांतरबाबत आम्हाला कोणतकल्पनाही देण्यात आलेली नाही. सरकारचा एकहीअधिकारी जनसुनावणीनंतर आपल्या वस्तीत फिरकला नसल्याचे धनगर समाजाचे मत आहे.
नियोजित मोपा विमानतळामुळे येथील धनगर कंुटुबीयांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. धनगर समाजाने आपल्याला कासारवर्णे सड्यावर एकाच ठिकाणी जागा देण्यात यावी. अशी मागणी जोर धरत आहे. सडा येथील घरे देवस्थान, देशप्रभू, परब, कांबली, फौजदार यांच्या मालकिची आहेत.
पूर्वजापांसून आमची लोकवस्ती आहे. परंतु सरकराने वीज, पाणी पुरविली नाही. वीज नसल्याने रात्रीच्या वेळी गॅस, मेणबत्ती, पेटेल दिव्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे कामे लवकर उरकावी लागतात. या फस्तीत अजूनही मातीच्या घरोघरी चुली आहेत. असे धनगर समाजातील नमिशा वरळ यांनी सांगितले. पाण्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी ३ ि़कमी पायी चालत जावे लागते. या समाजातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही. त्यासाठी मुलांना ३ कि.मी पायी शाळेला जावे लागते. असे वरक पुढे म्हणाल्या.
धनगर समाजातील लोकांना विमानाचे कुतूहल असले करीही घर संसाराची चिंता जास्त आहे. घरावर बुलडोझर फिरवून घरांचे कुठल्या कुठे स्थलांतर करतील अशी भिती त्यांना वाटत आहे. समाजातील सगळ्या लोकांची घरे एकाच ठिकाणी स्थलांतरीत करावी. तसेच वीज, पाणी, रस्ता व योग्य मोबदला देण्यात यावा. विमानतळाला विरोध नाही. परंतु सरकराने पुढच्या पिढीचा विचार करावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिध)
फोटो ओळी : मोपा सड्यावरील धनगरांची घरे, मुले पायी चालत शाळेत जाताना व काडूच्या बागायती. (छाया : निवृत्ती शिरोडकर)
....................