शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:20 IST

Bihar SRA News: बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यारून सध्या वातावरण तापले आहे. मतदार याद्यांच्या पडताळणीनंतरही काही चुका समोर येत आहेत. दरम्यान, बिहारमधील सिवान जिल्ह्यातील अरजानीपूर गावातील एका महिला मतदाराचं वय १२४ वर्षे दाखवल्याने या प्रकाराची चर्चा पाटण्यापासून दिल्लीपर्यंत झाली.

बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यारून सध्या वातावरण तापले आहे. मतदार याद्यांच्या पडताळणीनंतरही काही चुका समोर येत आहेत. दरम्यान, बिहारमधील सिवान जिल्ह्यातील अरजानीपूर गावातील एका महिला मतदाराचं वय १२४ वर्षे दाखवल्याने या प्रकाराची चर्चा पाटण्यापासून दिल्लीपर्यंत झाली. अखेर या महिलेनेच समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.

अरजानीपूर गावातील मिंता देवी असं या महिलेचं नाव असून, तिचं नाव पहिल्यांदाच मतदार यादीमध्ये जोडण्यात आलं होतं. मात्र तिचं वय १२४ वर्षे दर्शवण्यात आल्याने शंका घेतली जात होती. मिंता देवी हीचं खरं वय ३५ वर्षे आहे. मात्र महिलेच्या मतदार ओळखपत्र आणि आधारकार्डवर १५ जुलै १९०० अशी जन्मतारीख नोंदवण्यात आली होती. त्यामुळे तिचं वय १२४ वर्षे असं नमूद करण्यात आलं होतं. ही बाब समोर येताच विरोधी पक्षांनी यावरून जोरदार हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षामधील अनेक खासदार संसद भवन परिसरामध्ये मिंता देवी यांचे फोटो आणि १२४ नॉट आऊट लिहिलेली टीशर्ट परिधान करून आले. यादरम्यान, सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

सीवानचे डीएम आदित्य प्रकाश यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा प्रकार टायपिंग मिस्टेकमधून घडला आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना चुकीच्या नोंदी झाल्या. त्यामुळे १२४ वर्षे अशी वयाची नोंद झाली.  मतदार पुनरीक्षणावेळीही ही चूक कायम राहिली. आता फॉर्म-८ च्या माध्यमातून सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता आठवडाभराच्या आत या वयामध्ये सुधारणा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्या वयाच्या नोंदीमध्ये चुका आहेत त्यांनीही त्याबाबत आक्षेप नोंदवून त्या दुरुस्त करून घ्याव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मिंता देवीचे पती धनंजय कुमार सिंह यांनी सांगितले की, ही एक तांत्रिक चूक आहे. त्यात सुधारणा कऱण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. तर लोकसंख्या अधिक असल्याने अशा चुका होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.  

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग