शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

संभ्रम संपला! सरकार-शेतकऱ्यांची आज नववी बैठक; कदाचित शेवटची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 08:24 IST

Farmer protest: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले की,  सरकार खुल्या मनाने शेतकऱ्यांसोबत बैठक करणार आहे. तसेच या कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले जातील. 

मेरठ : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे निलंबित केले असून त्यावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्य़ासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९वी बैठक आज होणार आहे. यामध्ये काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा सरकारला आहे. यावर जदयूच्या नेत्याने सरकारला सल्ला दिला आहे. खासदार केसी त्यागी यांनी म्हटले की, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांनी हा प्रश्न मिशांचा प्रश्न म्हणून हाताळू नये असे म्हटले आहे. 

त्यागी यांनी सांगितले दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. जदयू नेत्यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांत ग्रामीण भागात चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर भर थंडीत जमलेल्या 50 शेतकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे गंभीरता पाहून अंतिम सहमती घेण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले की,  सरकार खुल्या मनाने शेतकऱ्यांसोबत बैठक करणार आहे. तसेच या कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले जातील. 

आतापर्यंत आठ चर्चा निष्फळ ठरल्या असून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने शेतकरी आणि सरकारमधील 9 वी बैठक होणार की नाही यावर संभ्रम होता. यावर तोमर यांनी शुक्रवारी 11 वाजता बैठक होणार असल्याचे सांगितले. शेतकरी नेते टिकैत यांनी सांगितले की, बैठकीत काय होते ते पाहू. आमच्या बैठका आमचा विरोध संपत नाही तोपर्य़ंत सुरु राहणार आहेत. जर या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही तर ही सरकारसोबतची शेवटची बैठक असणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने बनविलेल्या समितीसमोर जाण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हे सदस्य कृषी कायद्यांच्या बाजुचे आहेत. यामुळे ते शेतकऱ्यांचे म्हणणे मांडू शकत नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष भूपिंद‍र सिंह मान यांनी समितीतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेत असून यासाठी कोणतेही पद सोडले जाऊ शकते असे ते म्हणाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी