शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाविरोधात मिशन ४००; विरोधकांचा २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेम प्लॅन' काय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 06:18 IST

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधी एकजुटीचा नवा फॉर्म्युला विकसित करत आहेत. कारण, अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारच्या संबंधांना विरोध करत आहेत. आतापर्यंत ज्या नेत्यांशी नितीशकुमार यांनी संवाद साधला आहे त्यांना सांगितले आहे की, काँग्रेसशिवाय एकजूट होऊ शकत नाही. 

लोकसभेच्या ४०० जागांवर भाजपच्या विरोधात सर्वांचा एकच उमेदवार उभा करण्याची नितीशकुमार यांची योजना आहे. जर आघाडी झाली नाही तर जागांबाबत तडजोड होऊ शकते. उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. २०१९च्या निवडणुकीत भाजपला ३००पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या कारण, विरोधी पक्ष विभागलेला होता. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, काँग्रेसने २०१९मध्ये जवळपास ४७५ जागा लढल्या आणि केवळ ५२ जागा जिंकल्या. जवळपास २२० जागा अशा आहेत जिथे काँग्रेस हा भाजपचा मुख्य विरोधक आहे. अनेक राज्यात एकत्र लढण्याचा फॉर्म्युला राबविणे नितीशकुमार यांच्यासाठी कठीण काम आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, ४०० लोकसभा मतदारसंघात एकजूट होऊ शकते.

कोणत्या राज्यात काय परिस्थिती?बिहार, झारखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाममध्ये काँग्रेसचे सहकारी पक्ष आहेत. तर, सपा आणि जद (एस) यांच्याशी चर्चा सुरू आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस केरळात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मात्र, तेलंगणात के. चंद्रशेखर राव, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि ओडिशात नवीन पटनायक हे नेते काँग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती आणि आपचे अरविंद केजरीवाल हे एकटेच निवडणूक लढवितात. त्यांना सोबत आणणे कठीण काम आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रतीक्षेत विरोधी पक्ष

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी २४ ऑगस्टपासून इटलीमध्ये आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे नेते अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उर्वरित नेत्यांसोबत चर्चा केली. सोनिया गांधी विदेशात असल्यामुळे नितीशकुमार आणि त्यांची चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नियमित तपासणीसाठी विदेशात गेलेल्या आहेत. याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अन्य विरोधी पक्षांना सोनिया गांधी परतण्याची प्रतीक्षा आहे. जेणेकरून, पुढील रणनीती तयार करता येईल. त्या लवकरच परततील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा