शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:05 IST

जनमत चाचणीचे निष्कर्ष; यूपीएची वाढेल ताकद, अन्य पक्षांनाही चांगले संख्याबळ

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू शकणार नाही, पण रालोआ सत्तेच्या जवळ पोहोचू शकेल, असा अंदाज टाइम्स नाऊ -व्हीएमआरने केलेल्या जनमत चाचणीतून आढळून आले आहे. भाजपाप्रणित रालोआला २५२ जागा मिळतील आणि काँग्रेसप्रणित यूपीएला १४७ जागा मिळतील, असे या चाचणीचे निष्कर्ष आहेत. अन्य पक्षांना मिळून १४४ जागा मिळतील, असेही या चाचणीतून दिसून आले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपाच्या जागा घसरून २१५ पर्यंत येतील आणि मित्रपक्षांना ३७ जागा मिळून रालोआची सदस्य संख्या २५२ पर्यंत जाईल, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. गेल्या वेळी ४४ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा ९६ जागा मिळतील, असाही या चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसेल. गेल्या वेळी ८0 पैकी ७१ जागा मिळवणाºया भाजपा व मित्रपक्षांना मिळून राज्यात केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागेल, तर सपा-बसपा आघाडीला ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळतील, असे चाचणीतून दिसते. तामिळनाडूमध्येही द्रमुक-काँग्रैस व मित्रपक्षांना ३९ पैकी ३५ जागा व भाजपाला पाठिंबा देणाºया अण्णा द्रमुकला ४ जागा मिळतील, असे दिसते.महाराष्ट्रात मात्र रालोआला यंदा ४८ पैकी तब्बल ४३ जागा, तर यूपीएला केवळ ५ जागाच मिळतील, असेही हा सर्व्हे सांगतो. पश्चिम बंगालमध्ये ताकद वाढवण्याचा भाजपाचा जोरदार प्रयत्न असला तरी भाजपा व मित्रांना ९ जागा मिळतील, तृणमूल काँग्रेसला ३२ जागा तर काँग्रेसला एक जागा मिळेल आणि डाव्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असे सर्व्हेतून दिसते. बिहारमध्ये ४0 पैकी २५ जागांवर रालोआला व १५ जागांवर यूपीएला यश मिळेल, असे अहवाल सांगतो.कर्नाटकात काँग्रैस व जेडीएसचे (यूपीए) सरकार असले तरी तिथे लोकसभेच्या २८ जागांपैकी भाजपा व यूपीए यांना प्रत्येकी १४ जागा मिळू शकतील. मध्य प्रदेशात आताच विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपाला सत्तेबाहेर केले. पण लोकसभेच्या २९ पैकी २३ जागा भाजपा व यूपीएला ६ जागा मिळू शकतात, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. रजस्थानातही जनतेने आता काँग्रेसला कौल दिला. पण लोकसभेच्या २५ पैकी १७ जागांवर रालोआ तर यूपीएला ७ जागा मिळतील. गुजरातमध्येही भाजपा २६ पैकी २४ जागांवर बाजी मारेल आणि काँग्रेसला दोनच जागा मिळतील, असे चाचणीचे निष्कर्ष आहेत.डाव्यांच्या गडावर काँग्रेसचा झेंडाआंध्रात २५ पैकी २३ जागांवर वायएसआर काँग्रेस बाजी मारेल व तेलगू देसमला दोनच जागा मिळतील, असे दिसते. तेलंगणात टीआरएसचे सरकार पुन्हा आले आहे. त्याच पक्षाला १७ पैकी १0, यूपीएला ५, रालोआ व अन्य पक्षांना मिळून दोन जागा मिळतील, असे निष्कर्ष सांगतात. ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे सरकार असले तरी तेथील २१ पैकी १२ जागा रालोआ जिंकू शकेल, बिजदला ७ व काँग्रेसला १ जागा मिळेल, असे दिसते. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असले तरी तिथे यंदा काँग्रेसप्रणित यूडीएफला २0 पैकी १६ जागा मिळतील, डाव्यांना ३ व भाजपाला १ जागा मिळू शकेल, असेही या जनमत चाचणीचे निष्कर्ष आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस