शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:05 IST

जनमत चाचणीचे निष्कर्ष; यूपीएची वाढेल ताकद, अन्य पक्षांनाही चांगले संख्याबळ

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू शकणार नाही, पण रालोआ सत्तेच्या जवळ पोहोचू शकेल, असा अंदाज टाइम्स नाऊ -व्हीएमआरने केलेल्या जनमत चाचणीतून आढळून आले आहे. भाजपाप्रणित रालोआला २५२ जागा मिळतील आणि काँग्रेसप्रणित यूपीएला १४७ जागा मिळतील, असे या चाचणीचे निष्कर्ष आहेत. अन्य पक्षांना मिळून १४४ जागा मिळतील, असेही या चाचणीतून दिसून आले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपाच्या जागा घसरून २१५ पर्यंत येतील आणि मित्रपक्षांना ३७ जागा मिळून रालोआची सदस्य संख्या २५२ पर्यंत जाईल, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. गेल्या वेळी ४४ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा ९६ जागा मिळतील, असाही या चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसेल. गेल्या वेळी ८0 पैकी ७१ जागा मिळवणाºया भाजपा व मित्रपक्षांना मिळून राज्यात केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागेल, तर सपा-बसपा आघाडीला ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळतील, असे चाचणीतून दिसते. तामिळनाडूमध्येही द्रमुक-काँग्रैस व मित्रपक्षांना ३९ पैकी ३५ जागा व भाजपाला पाठिंबा देणाºया अण्णा द्रमुकला ४ जागा मिळतील, असे दिसते.महाराष्ट्रात मात्र रालोआला यंदा ४८ पैकी तब्बल ४३ जागा, तर यूपीएला केवळ ५ जागाच मिळतील, असेही हा सर्व्हे सांगतो. पश्चिम बंगालमध्ये ताकद वाढवण्याचा भाजपाचा जोरदार प्रयत्न असला तरी भाजपा व मित्रांना ९ जागा मिळतील, तृणमूल काँग्रेसला ३२ जागा तर काँग्रेसला एक जागा मिळेल आणि डाव्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असे सर्व्हेतून दिसते. बिहारमध्ये ४0 पैकी २५ जागांवर रालोआला व १५ जागांवर यूपीएला यश मिळेल, असे अहवाल सांगतो.कर्नाटकात काँग्रैस व जेडीएसचे (यूपीए) सरकार असले तरी तिथे लोकसभेच्या २८ जागांपैकी भाजपा व यूपीए यांना प्रत्येकी १४ जागा मिळू शकतील. मध्य प्रदेशात आताच विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपाला सत्तेबाहेर केले. पण लोकसभेच्या २९ पैकी २३ जागा भाजपा व यूपीएला ६ जागा मिळू शकतात, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. रजस्थानातही जनतेने आता काँग्रेसला कौल दिला. पण लोकसभेच्या २५ पैकी १७ जागांवर रालोआ तर यूपीएला ७ जागा मिळतील. गुजरातमध्येही भाजपा २६ पैकी २४ जागांवर बाजी मारेल आणि काँग्रेसला दोनच जागा मिळतील, असे चाचणीचे निष्कर्ष आहेत.डाव्यांच्या गडावर काँग्रेसचा झेंडाआंध्रात २५ पैकी २३ जागांवर वायएसआर काँग्रेस बाजी मारेल व तेलगू देसमला दोनच जागा मिळतील, असे दिसते. तेलंगणात टीआरएसचे सरकार पुन्हा आले आहे. त्याच पक्षाला १७ पैकी १0, यूपीएला ५, रालोआ व अन्य पक्षांना मिळून दोन जागा मिळतील, असे निष्कर्ष सांगतात. ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे सरकार असले तरी तेथील २१ पैकी १२ जागा रालोआ जिंकू शकेल, बिजदला ७ व काँग्रेसला १ जागा मिळेल, असे दिसते. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असले तरी तिथे यंदा काँग्रेसप्रणित यूडीएफला २0 पैकी १६ जागा मिळतील, डाव्यांना ३ व भाजपाला १ जागा मिळू शकेल, असेही या जनमत चाचणीचे निष्कर्ष आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस