शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन या, भाजपा मंत्र्याचा विदेशी पर्यटकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे

भुवनेश्वर, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी भारतात फिरण्यासाठी येणा-या पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्स यांनी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. 

अल्फोन्स यांना विचारण्यात आलं होतं की, अनेक राज्यांमध्ये गोमांस बंदी करण्यात आली आहे. बंदीमुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. यावर उत्तर देताना अल्फोन्स यांनी सांगितलं की, 'विदेशी पर्यटक आपल्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे भारतात येण्याआधी त्यांनी तिथेच गोमांस खाऊन यावं'. 

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 33 व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी विदेशी पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी काही दिवसांपुर्वी केरळमधील लोक गोमांस खाऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलं आहे. माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या अल्फोन्स यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर बोलताना सांगितलं होतं की, 'ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांस बंदी केली जाणार नाही सांगितलं होतं. त्यानुसार केरळमध्येही गोमांस विक्री कायम राहील'.

अल्फोन्ज यांनी विरोधाभास निर्माण करणारी दोन वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत. जेव्हा पत्रकारांनी अल्फोन्स यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'ही बिना हाता-पायाची गोष्ट आहे. मी खाद्यमंत्री नाही आहे, जो हा निर्णय घेईल'.

केंद्रीय पर्यटन मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अल्फोन्स यांनी सांगितलं आहे की, 'आमचं मंत्रालय देशातील पर्याटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत आहे'. पुढे बोलताना ते बोलले की, 'पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसंत त्यांच्याकडे असणा-या कल्पना आमच्याशी शेअर करण्यासही सांगितलं आहे. लोकांकडून येणा-या कल्पना एकत्र करुन एका महिन्यानंतर निवडक कल्पनांवर काम सुरु करणार आहोत'.

टॅग्स :BJPभाजपा