शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन या, भाजपा मंत्र्याचा विदेशी पर्यटकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे

भुवनेश्वर, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी भारतात फिरण्यासाठी येणा-या पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्स यांनी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. 

अल्फोन्स यांना विचारण्यात आलं होतं की, अनेक राज्यांमध्ये गोमांस बंदी करण्यात आली आहे. बंदीमुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. यावर उत्तर देताना अल्फोन्स यांनी सांगितलं की, 'विदेशी पर्यटक आपल्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे भारतात येण्याआधी त्यांनी तिथेच गोमांस खाऊन यावं'. 

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 33 व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी विदेशी पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी काही दिवसांपुर्वी केरळमधील लोक गोमांस खाऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलं आहे. माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या अल्फोन्स यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर बोलताना सांगितलं होतं की, 'ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांस बंदी केली जाणार नाही सांगितलं होतं. त्यानुसार केरळमध्येही गोमांस विक्री कायम राहील'.

अल्फोन्ज यांनी विरोधाभास निर्माण करणारी दोन वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत. जेव्हा पत्रकारांनी अल्फोन्स यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'ही बिना हाता-पायाची गोष्ट आहे. मी खाद्यमंत्री नाही आहे, जो हा निर्णय घेईल'.

केंद्रीय पर्यटन मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अल्फोन्स यांनी सांगितलं आहे की, 'आमचं मंत्रालय देशातील पर्याटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत आहे'. पुढे बोलताना ते बोलले की, 'पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसंत त्यांच्याकडे असणा-या कल्पना आमच्याशी शेअर करण्यासही सांगितलं आहे. लोकांकडून येणा-या कल्पना एकत्र करुन एका महिन्यानंतर निवडक कल्पनांवर काम सुरु करणार आहोत'.

टॅग्स :BJPभाजपा