शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन या, भाजपा मंत्र्याचा विदेशी पर्यटकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे

भुवनेश्वर, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी भारतात फिरण्यासाठी येणा-या पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्स यांनी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. 

अल्फोन्स यांना विचारण्यात आलं होतं की, अनेक राज्यांमध्ये गोमांस बंदी करण्यात आली आहे. बंदीमुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. यावर उत्तर देताना अल्फोन्स यांनी सांगितलं की, 'विदेशी पर्यटक आपल्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे भारतात येण्याआधी त्यांनी तिथेच गोमांस खाऊन यावं'. 

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 33 व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी विदेशी पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी काही दिवसांपुर्वी केरळमधील लोक गोमांस खाऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलं आहे. माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या अल्फोन्स यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर बोलताना सांगितलं होतं की, 'ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांस बंदी केली जाणार नाही सांगितलं होतं. त्यानुसार केरळमध्येही गोमांस विक्री कायम राहील'.

अल्फोन्ज यांनी विरोधाभास निर्माण करणारी दोन वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत. जेव्हा पत्रकारांनी अल्फोन्स यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'ही बिना हाता-पायाची गोष्ट आहे. मी खाद्यमंत्री नाही आहे, जो हा निर्णय घेईल'.

केंद्रीय पर्यटन मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अल्फोन्स यांनी सांगितलं आहे की, 'आमचं मंत्रालय देशातील पर्याटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत आहे'. पुढे बोलताना ते बोलले की, 'पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसंत त्यांच्याकडे असणा-या कल्पना आमच्याशी शेअर करण्यासही सांगितलं आहे. लोकांकडून येणा-या कल्पना एकत्र करुन एका महिन्यानंतर निवडक कल्पनांवर काम सुरु करणार आहोत'.

टॅग्स :BJPभाजपा