शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कॉलेजियम वाद : न्यायमूर्तींच्या नेमणुका रोखून ठेवणे लोकशाहीसाठी घातक, माजी न्यायमूर्ती नरिमन यांचे विधिमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 08:44 IST

Collegium Controversy: उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर माजी न्यायमूर्ती रोहिन्टन फली नरिमन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई/नवी दिल्ली : उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर माजी न्यायमूर्ती रोहिन्टन फली नरिमन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉलेजियमने शिफारस केलेली नावे रोखून ठेवणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे नरिमन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, नरिमन हे स्वत: कॉलेजियमचे सदस्य होते. निवृत्त होण्यापूर्वी न्यायवृंदाचा भाग असलेले न्या. नरिमन यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागाने आयोजित केलेल्या न्या. एम. सी. छागला स्मृती व्याख्यानादरम्यान वरील विधान केले.न्यायमूर्तींच्या नेमणुकात सरकारचाही सहभाग असायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून विरोध होत आहे. त्यावरून कायदा मंत्री कॉलेजियम पद्धतीवर टीका करीत आहेत. ज्ञात असावे की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेच कॉलेजियमचे सदस्य असतात.nरोहिन्टन फली नरिमन हे ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त झाले. तेव्हापर्यंत ते कॉलेजियमचाच भाग होते. nकायदामंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉलेजियमच्या पद्धतीवर सातत्याने टिप्पणी केली आहे.  nउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही याबाबत काही दिवसांपूर्वीच विधान केले होते. 

सरकारला ३० दिवसांची मुदत बंधनकारक करायला हवीnन्यायवृंदाने न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केल्यावर केंद्र सरकारने ३० दिवसांत उत्तर द्यावे, तसे न केल्यास सरकारची मंजुरी आहे, असे समजून नावांवर शिक्कामोर्तब करावे. न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत भिजत घोंगडे ठेवणे, हे लोकशाहीला घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये असलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी घटनात्मक खंडपीठ स्थापन करावे आणि त्याला ‘पाचवे न्यायमूर्ती प्रकरण’ असा उल्लेख करावा.nतुमच्याकडे स्वतंत्र आणि निर्भय न्यायमूर्ती नसतील तर निरोप घ्या. बाकी काहीच नाही. माझ्या मते, हा बुरूज जर कोसळला तर आपण अंधकारमय युगात प्रवेश करू, ज्यामध्ये आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस स्वतःला एकच प्रश्न विचारेल; जर मिठाचा स्वाद कमी झाला असेल तर मीठ घालावे का?

कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावरही नरिमन यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. निर्भय न्यायमूर्ती नसले तर आपण नव्या अंधारयुगाच्या तळविहिन गर्तेत ढकलले जाऊ, असेही माजी न्यायमूर्ती नरिमन म्हणाले. 

नरिमन यांनी काय म्हटले? कायदामंत्र्यांना २ घटनात्मक मूलतत्त्वे मी सांगू इच्छितो. पहिल्या तत्त्वानुसार, किमान ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाला घटनेचा अर्थ लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमेरिकेतही अशी तरतूद नाही. ती केवळ आपल्याकडेच आहे. दुसरे तत्त्व म्हणजे, एकदा घटनापीठाने घटनेचा अर्थ लावला की, त्या निवाड्याची अंमलबजावणी करणे कलम १४४ नुसार तुमची (सरकारची) बंधनकार जबाबदारी आहे.  यावर टीका केली जाऊ शकते. एक नागरिक म्हणून मी न्यायालयीन निवाड्यावर टीका करू शकतो. पण हे विसरू नका की, आज मी सामान्य नागरिक आहे आणि तुम्ही अधिकारावर आहात. न्यायालयाचा निर्णय तुमच्यासाठी बंधनकारक जबाबदारी आहे, मग तो निर्णय बरोबर असो अथवा चूक.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार