शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कॉलेजियम वाद : न्यायमूर्तींच्या नेमणुका रोखून ठेवणे लोकशाहीसाठी घातक, माजी न्यायमूर्ती नरिमन यांचे विधिमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 08:44 IST

Collegium Controversy: उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर माजी न्यायमूर्ती रोहिन्टन फली नरिमन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई/नवी दिल्ली : उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर माजी न्यायमूर्ती रोहिन्टन फली नरिमन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉलेजियमने शिफारस केलेली नावे रोखून ठेवणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे नरिमन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, नरिमन हे स्वत: कॉलेजियमचे सदस्य होते. निवृत्त होण्यापूर्वी न्यायवृंदाचा भाग असलेले न्या. नरिमन यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागाने आयोजित केलेल्या न्या. एम. सी. छागला स्मृती व्याख्यानादरम्यान वरील विधान केले.न्यायमूर्तींच्या नेमणुकात सरकारचाही सहभाग असायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून विरोध होत आहे. त्यावरून कायदा मंत्री कॉलेजियम पद्धतीवर टीका करीत आहेत. ज्ञात असावे की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेच कॉलेजियमचे सदस्य असतात.nरोहिन्टन फली नरिमन हे ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त झाले. तेव्हापर्यंत ते कॉलेजियमचाच भाग होते. nकायदामंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉलेजियमच्या पद्धतीवर सातत्याने टिप्पणी केली आहे.  nउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही याबाबत काही दिवसांपूर्वीच विधान केले होते. 

सरकारला ३० दिवसांची मुदत बंधनकारक करायला हवीnन्यायवृंदाने न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केल्यावर केंद्र सरकारने ३० दिवसांत उत्तर द्यावे, तसे न केल्यास सरकारची मंजुरी आहे, असे समजून नावांवर शिक्कामोर्तब करावे. न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत भिजत घोंगडे ठेवणे, हे लोकशाहीला घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये असलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी घटनात्मक खंडपीठ स्थापन करावे आणि त्याला ‘पाचवे न्यायमूर्ती प्रकरण’ असा उल्लेख करावा.nतुमच्याकडे स्वतंत्र आणि निर्भय न्यायमूर्ती नसतील तर निरोप घ्या. बाकी काहीच नाही. माझ्या मते, हा बुरूज जर कोसळला तर आपण अंधकारमय युगात प्रवेश करू, ज्यामध्ये आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस स्वतःला एकच प्रश्न विचारेल; जर मिठाचा स्वाद कमी झाला असेल तर मीठ घालावे का?

कॉलेजियम पद्धतीवर टीका केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावरही नरिमन यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. निर्भय न्यायमूर्ती नसले तर आपण नव्या अंधारयुगाच्या तळविहिन गर्तेत ढकलले जाऊ, असेही माजी न्यायमूर्ती नरिमन म्हणाले. 

नरिमन यांनी काय म्हटले? कायदामंत्र्यांना २ घटनात्मक मूलतत्त्वे मी सांगू इच्छितो. पहिल्या तत्त्वानुसार, किमान ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाला घटनेचा अर्थ लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमेरिकेतही अशी तरतूद नाही. ती केवळ आपल्याकडेच आहे. दुसरे तत्त्व म्हणजे, एकदा घटनापीठाने घटनेचा अर्थ लावला की, त्या निवाड्याची अंमलबजावणी करणे कलम १४४ नुसार तुमची (सरकारची) बंधनकार जबाबदारी आहे.  यावर टीका केली जाऊ शकते. एक नागरिक म्हणून मी न्यायालयीन निवाड्यावर टीका करू शकतो. पण हे विसरू नका की, आज मी सामान्य नागरिक आहे आणि तुम्ही अधिकारावर आहात. न्यायालयाचा निर्णय तुमच्यासाठी बंधनकारक जबाबदारी आहे, मग तो निर्णय बरोबर असो अथवा चूक.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार