शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

नोटाबंदीनंतर आता 'नाणेबंदी'?, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:18 AM

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होणार आहेत. चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदी सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं समजतं आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे. 

भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचं उत्पादन केलं जातं. पण आता या चारही टांकसाळीमध्ये मंगळवारपासून नाण्यांचं उत्पादन करणं बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नोटाबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. नाण्यांचं उत्पादन मोठ्याप्रमाणावर करण्यात आलं होतं. त्यामुळे आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा साठा जास्त झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचं काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं होतं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं होतं. या नोटा बंद केल्यानंतर सरकारने नव्या ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचं म्हंटलं होतं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील एकत्र 85 टक्के करंसी रद्द करण्यात आली होती.  

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक