शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

Coal Shortage: यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 08:09 IST

Coal Shortage in India: केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

ठळक मुद्दे दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे.सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट(Coal Shortage) आलं आहे. एक खासगी कंपनी या संकटाचा फायदा उचलणार आहे का? याचा तपास कोण करणार? - काँग्रेस

नवी दिल्ली – देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

१३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट

सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट(Coal Shortage) आलं आहे. १६ प्रकल्पात तर एक दिवसाचा कोळसा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे. तर १८ प्रकल्पात केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात हरियाणा आणि महाराष्ट्र येथे ३ प्रकल्प आहेत. ज्यात एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. याचसह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार येथे एक एक प्रकल्प आहेत जेथे १ दिवसाचा साठा आहे.

काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, अचानक देशात पॉवर प्लांटमध्ये कोळसा संकटाची बातमी समोर आली आहे. एक खासगी कंपनी या संकटाचा फायदा उचलणार आहे का? याचा तपास कोण करणार? तर पेट्रोलनंतर आता वीज दरवाढीचं संकट लोकांवर येणार आहे. कोळसा संकट वाढलं आहे असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सांगितले आहे.

परिस्थिती बिकट होतेय?

सर्वात पहिलं यूपीबाबत बोललं तर कोळसा संकटामुळे यूपीत विजेचा तुटवडा जाणवू लागला आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागातही विजेत कपात केली जात आहे. कागदोपत्री ४-५ तास विज कपात केली जातेय परंतु वास्तविक त्यापेक्षा अधिक भारनियमन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातही वीज संकट उभं राहिलं आहे. यावर कॅबिनेट मंत्री प्रधुमन सिंह तोमर यांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये कोळसा नाही तिथेही वीज संकट आहे असं प्रत्युत्तर मंत्र्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात ७ थर्मल पॉवर प्लांटमध्ये १३ यूनिट ठप्प

केंद्र सरकारने दावा केला आहे की, वीज निर्मितीवर कुठलंही संकट नाही पण तसा बनाव केला जात आहे. परंतु हे सत्य आहे की, कोळसा संकटामुळे महाराष्ट्रातील ७ थर्मल पॉवर प्लांटमध्ये १३ यूनिट ठप्प झाली आहेत. राज्य सरकारने नॅशनल एक्सचेंजकडून पॉवर खरेदी करण्याची तयारी केली आहे. एकतर कोळसा नाही त्यात महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या बल्लापूर अंडर ग्राऊंड माइंसमधील जवळपास ८०० मजुरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. याठिकाणी दिवसाला ३०० टन कोळसा उत्पादित करण्यात येतो. संपूर्ण देशात वीज संकट उभं राहिलं असताना येथील मजुरांनी वेतनवाढीची मागणी करत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

आणखी वाचा

कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटIndiaभारतDiwaliदिवाळी