शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:33 IST

भारतातील सुमारे दोनतृतीयांश वीजनिर्मिती कोळसा ऊर्जा प्रकल्पातून होते. एवढेच नाही तर देशातील लोकसंख्येचा मोठा वर्ग कोळसा उद्योगावर अवलंबून आहे.

नवी दिल्ली:जगातील हवामान बदल थांबवण्यासाठी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व लवकरात लवकर कमी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान आहे ते कोळशाचा वापर, जो अजूनही चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये वीज निर्मितीसाठी मुख्य इंधन म्हणून वापरला जात आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा जीवाश्म इंधन उत्सर्जित करणारा देश आहे आणि कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ग्लासगो हवामान परिषदेनंतर अनेक देशांवर जीवाश्म इंधनमुक्त होण्यासाठी दबाव वाढत असताना भारताचे कोळशावरचे अवलंबित्व संपवणे हे मोठे आव्हान आहे.

जीवाश्म इंधनावर पाश्चिमात्य देशभारतासारख्या विकसनशील देशातील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व दूर करणे सोपे नाही. शेकडो वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी जीवाश्म इंधन वापरुन जगाला प्रदूषित केले आणि विकसित देश बनले. आता तेच देश प्रदुषणाचे खापर विकसनशील देशांवर फोडत आहेत.

भारतातील कोळसा उद्योग

पाश्चिमात्य देश भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अशा स्थितीत कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जातोय. कोळसा हा जीवाश्म इंधनाचा सर्वात वाईट प्रकार आहे, परंतु भारताच्या ऊर्जा उत्पादनात त्याचा वाटा 70 टक्के आहे. इतकेच नाही तर भारतातील पायाभूत सुविधाही नजीकच्या भविष्यात दुसऱ्या स्त्रोताकडे जाण्यास अजिबात तयार नाही. 

काहींसाठी कोळसा जगण्याचे साधनब्रुकिंग्स संस्थेच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील कोळसा उद्योगात सुमारे 4 दशलक्ष लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. यापैकी बहुतेक कोळसा खाणी पूर्वेला आहेत, ज्यांना कोळसा पट्टा म्हणतात. या खाणी झारखंड, छत्तीसगड किंवा ओडिशामध्ये आहेत. या भागातील अर्थव्यवस्थेत कोळशाचे मोठे योगदान आहे आणि हा कोळसा काही स्थानिकांसाठी जगण्याचे साधन आहे.

मोठे संकट येईल

आंतरराष्ट्रीय दबावाखाली कोळसा उत्पादन बंद केले तर भारतातील अनेक लोक बेघर होतील. हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट येईल. अनेक दशकांपासून खाणींमध्ये काम करुन हे लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. गेल्या दशकात कोळशाचा वापर दुपटीने वाढला आहे. भारताला अजूनही मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करावा लागतो आणि येत्या काही वर्षांत अनेक खाणींमध्ये खाणकाम सुरू करण्याची योजना आहे. दरम्यान, भारतीय व्यक्ती अमेरिकन किंवा ब्रिटिश नागरिकांपेक्षा खूपच कमी वीज वापरतो. 

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटpollutionप्रदूषणIndiaभारत