शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!

मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!
मुंबई - स्वत: एक उत्कृष्ट वक्ते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्यांचा समावेश करावा, या विषयी मार्गदर्शन करणारे तीन पानी पत्र प्रत्येक मंत्र्यास पाठविले आहे.
विशेषत: शेतकरी वर्गाच्या हितासाठी राज्य शासनाने जी पावले उचलली त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केला आहे. जलयुक्त शिवार योजना, आत्महत्याग्रस्त १४ जिल्‘ांमध्ये केल्या जात असलेल्या उपाययोजनाची माहिती पत्रात देण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शासनाचे हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण १५ ऑगस्ट रोजी जिल्‘ातील जनतेला संबोधित करतानाच्या भाषणात त्यांचा उल्लेख करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
बळीराजासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी मंत्र्यांनी करावी आणि या बाबत शेतकर्‍यांच्या भावना आपल्याला पत्राने कळवाव्यात असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनाही त्यांनी अशा सूचना केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)
-------------------------------
प्रारंभ १५ ऑगस्टपासून
शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात एक लाख विहिरी आणि ५० हजार शेततळी निर्माण करण्याच्या कार्यक्रमास १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्यवाटपही स्वातंत्र्यदिनापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
----------------------------------