शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी पूर्वनियोजित कटकारस्थान; CM योगींचा गंभीर आरोप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 21:37 IST

पंतप्रधानांचा ताफा अशा ठिकाणी थांबवण्यात आला होता, जेथे ड्रोननेही हल्ला होऊ शकत होता...

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेत राहिलेली त्रुटी हे पूर्वनियोजित रक्तरंजित कटकारस्थान होते. यासाठी देश काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस आणि पंजाब सरकार सीएम योगी बरसले -सीएम योगी म्हणाले, पंजाब सरकारने देशातील सर्वोच्च कार्यकारी असलेल्या पंतप्रधान मोदी यांची सुरक्षितता सुरक्षा प्रोटोकॉल (PM Modi Security Protocols) आणि ब्लू बुक नुसार सुनिश्चित करायला हवी होती. पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात सामान्य शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचेही पालन केले नाही.

पंतप्रधानांच्या ताफ्यावर ड्रोननेही हल्ला होण्याची होती भीती -पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात आधीच गुप्तचर विभागाकडून माहिती मिळालेली होती. खलिस्तानी विचारांच्या लोकांचीही वक्तव्ये येत होती. पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी एक लाख लोक येणार असेही इंटेलिजेंस इनपुट होते. त्या लोकांना आधीपासूनच पर्यायी मार्गाची माहिती होती. पंतप्रधानांचा ताफा अशा ठिकाणी थांबवण्यात आला होता, जेथे ड्रोननेही हल्ला होऊ शकत होता. पंजाब सरकारने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. 

काँग्रेसने देशाची माफी मागावी -सीएम चन्नींनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत केलेल्या हलगर्जीपणासंदर्भात प्रियांका गांधींना माहिती देणे निंदनीय आहे. हा एक प्रायोजित कट होता. काँग्रेस आणि पंजाब सरकार मिळून सुरक्षिततेसंदर्भात केवळ भारताच्या घटनात्मक तरतुदींचे उल्लंघनच करत नव्हते, तर देशाविरुद्ध कट रचत होते. या संपूर्ण प्रकारात काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी, असेही योगी म्हणाले.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस