शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आई, येणं शक्य नाही...; वडिलांच्या निधनानंतर योगींचे भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:40 IST

योगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूचा निरोप मिळाला तेव्हा, योगी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीत होते.

ठळक मुद्देयोगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार असून वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नसल्याचा निर्णय योगी यांनी घेतला आहेकमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडण्याचे योगींचे कुटुंबीयांना आवाहन

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे सोमवारी निधन झाले. लॉकडाऊनमुळे योगी यांना वडिलांचे अखेरचे दर्शन घेणेही अशक्य होत आहे. आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार असून वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नसल्याचा निर्णय योगी यांनी घेतला आहे.  याच बरोबर, त्यांनी कुटुंबीयांनाही लॉकडाऊनचे पालन करत कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडावा, असे सांगत आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे.

योगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूचा निरोप मिळाला तेव्हा, योगी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीत होते. वडिलांचा निरोप मिळाल्यानंतरही ही बैठक सुरूच होती. याच वेळी येथील काही अधिकाऱ्यांनी योगी यांची वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची तयारीही केली. मात्र, योगी यांनी दिल्ली अथवा उत्तराखंड येथे जाणार नसल्याचे सांगितले.

अखेरचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा पण... -यासंदर्भात योगी यांनी एक पत्र लिहिले आहे. यात, आपल्याला वडिलांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांना अखेरचे पाहण्याची उत्कट इच्छा आहे. पण, जागतीक महामारीमुळे ते अशक्य होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. योगींनी लिहिलेले हे पत्र अत्यंत भावनिक आहे. तसेच त्यांनी आपल्या वैयक्तिक जिवनापेक्षाही कर्तव्याला अधिक महत्व दिले आहे.

आईला लिहिले भावनिक पत्र -या पत्रत योगी यांनी म्हटले आहे, की 'पूजनीय वडिलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते माझे जन्मदाता आहेत. आयुष्यात प्रामानिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावाने लोक कल्यानाचे कार्य करण्याची शिकवन त्यांनी बालपणी मला दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, जागतीक महामारी कोरोना व्हायरसविरुद्ध देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या २३ कोटी  जनतेची जबाबदारी  माझ्यावर आहे. मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या योजनेमुळे मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही. पूजनीय आई आणि पूर्वाश्रमीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.'

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या