शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून एक वीट अन् ११ रुपये द्यावेत; मुख्यमंत्र्यांचं लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 10:29 IST

अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या.

लखनऊ - राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या बांधकाम निधीसाठी लोकांकडे आवाहन केलं आहे. भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून ११ रुपये आणि एक वीट असं योगदान द्यावं असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना सांगितले आहे. झारंखड येथील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, ५०० वर्षापासून सुरु असलेला वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी सोडविण्यात आला आहे. काँग्रेस, आरजेडी, सीपीआय-एमएल यांच्यासह अन्य पक्ष कित्येक वर्ष सुरु असलेला हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

तसेच लवकरच अयोध्या येथे भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात येणार आहे. मी झारखंडमधील प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की, प्रत्येक घरातून एक वीट आणि ११ रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी द्यावेत. मी त्या प्रदेशातून येतो ज्याठिकाणी प्रभू राम आहेत अन् त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटलं जातं. या राज्यात गरीब, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचं काम केलं जातं. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

त्याचसोबत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे हिंदू, शीख, बौद्ध, इसाई आणि पारसी या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करतायेत. या लोकांना पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्याकडून प्रचंड छळ केला जातो. हे लोकं शरणार्थी जीवन जगत आहेत. यांच्याविरोधात काँग्रेस आंदोलन करते. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतं असा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे अयोध्येत राममंदिराच्या उभारण्याच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यायालयीन दालनात या फेरविचार याचिकांची सुनावणी झाली होती.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी