शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:11 IST

भूमीपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करुन पृथ्वी मातेचे पूजा केली जाते

ठळक मुद्देथोड्या काळासाठी सुप्रीम कोर्टानेही जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भूमीपूजन होऊ शकत नाही.बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वावादी भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं

मुंबई – राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर विश्व हिंदू परिषदेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिराचं भूमीपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हावं असं उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

याबाबत विश्व हिंदू परिषदेने अधिकृतपणे पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे विधान ऐकून आश्चर्य वाटले, फक्त अंध विरोधाच्या भावनेतून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय सूचवला आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वावादी राजकारणाची भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं? अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

तसेच भूमीपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करुन पृथ्वी मातेचे पूजा केली जाते, त्याचा आशीर्वाद मागितला जातो, हे काम दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकत नाही. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत देशातील जनता पुढील जीवन जगत आहे. थोड्या काळासाठी सुप्रीम कोर्टानेही जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. अमरनाथ यात्रा स्थगित झाल्यानंतरही यात्रेचे धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आली असं विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार म्हणाले.

त्याचसोबतच भूमीपूजन कार्यक्रमात केवळ २०० मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, या कार्यक्रमासाठी आरोग्यविषयक बाबींचे सर्व नियम पाळले जाणार आहेत, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांची चिंता विरोध करण्यासाठी केलेले ढोंग आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले होते की, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावे. त्यांना तुम्ही कसे अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराच्या आंदोलनात तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. राममंदिर हा भावनेचा विषय आहे. ज्या लाखो रामभक्तांना तिथे उपस्थित राहायचे आहे. त्यांचे काय करणार? त्यांना अडवणार की, येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार झाला तर? त्यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असा सल्ला ठाकरे यांनी दिला होता.   

टॅग्स :HinduहिंदूUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे