शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

CM Nitish Kumar on Liquor Ban: 'दारू पिणारे महापापी, मी त्यांना भारतीय मानत नाही', नितीश कुमार यांचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:33 IST

Nitish Kumar statement on Liquor Ban: ''दारुबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली. जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात.''

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा राज्यातील दारुबंदीबाबत (Bihar Liquor Ban) अजब विधान केले आहे. बुधवारी विधानसभेत मद्य बंदी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यात कोणीही पहिल्यांदा दारू पिताना पकडला गेला, तर त्याला दंड भरुन सोडले जाऊ शकते. दारुबंदीच्या दुरुस्ती विधेयकावरून विधानसभेत जोरदार गदारोळ सुरू असतानाच, विधान परिषदेत दारुबंदीवरील चर्चेदरम्यान नितीश कुमारांनी मोठे वक्तव्य केले.

''जे लोक दारुचे सेवन करतात आणि गांधीजींच्या भावनांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना मी भारतीय मानत नाही'', असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले. नितीश कुमार पुढे म्हणाले की, ''दारुचे सेवन करणे अत्यंत अयोग्य आणि मोठे पाप आहे. दारुचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. दारुबंदीमुळे महसुलाचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद करणारे चुकीचे आहेत. पूर्वी बिहारमध्ये दारू विकली जायची तेव्हा 5 हजार कोटी रुपयांचा महसूल यायचा, पण दारुबंदीनंतर लोकांना खूप फायदा झाला.''

दारुबंदीमुळे भाजीपाला खप वाढलानितीश कुमार पुढे म्हणाले की, ''जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात. दारुबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली. आता लोक घरी भाजी आणतात.'' दरम्यान, नितीश कुमारांच्या विधानावर आरजेडी नेते शिवानंद तिवारी टोमणा मारला. ''नितीश कुमार अप्रत्यक्षपणे आपल्याच सहकाऱ्यांना पापी आणि नालायक म्हणत आहेत'', असे शिवानंद म्हणाले. तसेच, ''दारू पिणे हा गुन्हा न माणणाऱ्या यूपी सरकारच्या शपथविधी सोहळ्याहून नितीश कुमार नुकतेच परतले. जे गांधींच्या मारेकऱ्यांना खरे देशभक्त मानतात, नितीश कुमार त्यांच्यासोबतच राज्यात सरकार चालवत आहेत,'' असेही ते म्हणाले. 

दारुबंदी कायद्यात अनेक महत्त्वाच्या सुधारणादारुबंदीच्या 6 वर्षानंतर नितीश सरकारने कायद्यात अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणेनुसार आता कोणत्याही आरोपीला दंड भरुन सोडता येणार आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावास होऊ शकतो. दारू पिण्याच्या गुन्ह्यात एखादी व्यक्ती वारंवार पकडली गेल्यास दंड आणि तुरुंगवास दोन्ही होऊ शकते. नव्या सुधारणेनुसार आरोपींना जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. दंडाची रक्कम येत्या काही दिवसांत सरकार ठरवेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारliquor banदारूबंदीBiharबिहार