शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

CM Nitish Kumar on Liquor Ban: 'दारू पिणारे महापापी, मी त्यांना भारतीय मानत नाही', नितीश कुमार यांचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:33 IST

Nitish Kumar statement on Liquor Ban: ''दारुबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली. जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात.''

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा राज्यातील दारुबंदीबाबत (Bihar Liquor Ban) अजब विधान केले आहे. बुधवारी विधानसभेत मद्य बंदी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यात कोणीही पहिल्यांदा दारू पिताना पकडला गेला, तर त्याला दंड भरुन सोडले जाऊ शकते. दारुबंदीच्या दुरुस्ती विधेयकावरून विधानसभेत जोरदार गदारोळ सुरू असतानाच, विधान परिषदेत दारुबंदीवरील चर्चेदरम्यान नितीश कुमारांनी मोठे वक्तव्य केले.

''जे लोक दारुचे सेवन करतात आणि गांधीजींच्या भावनांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना मी भारतीय मानत नाही'', असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले. नितीश कुमार पुढे म्हणाले की, ''दारुचे सेवन करणे अत्यंत अयोग्य आणि मोठे पाप आहे. दारुचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. दारुबंदीमुळे महसुलाचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद करणारे चुकीचे आहेत. पूर्वी बिहारमध्ये दारू विकली जायची तेव्हा 5 हजार कोटी रुपयांचा महसूल यायचा, पण दारुबंदीनंतर लोकांना खूप फायदा झाला.''

दारुबंदीमुळे भाजीपाला खप वाढलानितीश कुमार पुढे म्हणाले की, ''जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात. दारुबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली. आता लोक घरी भाजी आणतात.'' दरम्यान, नितीश कुमारांच्या विधानावर आरजेडी नेते शिवानंद तिवारी टोमणा मारला. ''नितीश कुमार अप्रत्यक्षपणे आपल्याच सहकाऱ्यांना पापी आणि नालायक म्हणत आहेत'', असे शिवानंद म्हणाले. तसेच, ''दारू पिणे हा गुन्हा न माणणाऱ्या यूपी सरकारच्या शपथविधी सोहळ्याहून नितीश कुमार नुकतेच परतले. जे गांधींच्या मारेकऱ्यांना खरे देशभक्त मानतात, नितीश कुमार त्यांच्यासोबतच राज्यात सरकार चालवत आहेत,'' असेही ते म्हणाले. 

दारुबंदी कायद्यात अनेक महत्त्वाच्या सुधारणादारुबंदीच्या 6 वर्षानंतर नितीश सरकारने कायद्यात अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणेनुसार आता कोणत्याही आरोपीला दंड भरुन सोडता येणार आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावास होऊ शकतो. दारू पिण्याच्या गुन्ह्यात एखादी व्यक्ती वारंवार पकडली गेल्यास दंड आणि तुरुंगवास दोन्ही होऊ शकते. नव्या सुधारणेनुसार आरोपींना जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. दंडाची रक्कम येत्या काही दिवसांत सरकार ठरवेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारliquor banदारूबंदीBiharबिहार