शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 9:32 PM

आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत.

कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिली आहे. यात, त्यांनी अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत, अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) 

ममता म्हणाल्या, भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप 24 तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत, टीम आणि नेते येत आहेत. ममता म्हणाल्या, ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते.

ममता म्हणाल्या, एक टीम आली होती, त्यांनी चहा पिला आणि ते परत निघून गेले. सध्या कोरोना परिस्थिती आहे. आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत. एवढेच नाही, तर भाजप नेते नेहमी-नेहमी येथे येत असल्याने राज्यात कोरोना वाढत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना ममता म्हणाल्या, मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. ते 20,000 कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लशीसाठी 30,000 कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत. 

याच वेळी ममतांनी पीएम केअर फडावरही भाष्य केले. पीएम केअर फंड कुठे आहे? ते तरुण वर्गाचा जीव का धोक्यात टाकत आहेत? त्यांच्या नेत्यांनी इकडे-तिकडे जाण्याऐवजी कोरोना रुग्णालयांचा दौरा करायला हवा, असे ममता म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसwest bengalपश्चिम बंगाल