शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 20:08 IST

केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे.

कोलकाता - ट्विटरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला नियंत्रणात आणण्यात अशस्वी ठरल्यानंतर, आता त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा संबंध आपल्या सरकारशी जोडताना त्या म्हणाल्या, की केंद्र सरकार आपल्या सरकारसोबतही असेच करत आहे. (CM Mamata Banerjee says centre trying to bulldoze twitter as it cant control the microblogging platform)

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘मी याचा निशेध करते. ते ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून त्याला प्रभाव शून्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते (केंद्र) ज्यांना आपल्याकडे वळवू शकत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत असेच वागत आहे. ते मला नियंत्रणात घेऊ शकत नाहीत, यामुळे माझ्या सरकारलाही प्रभाव शून्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

वय वंदना योजना; फक्त एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला पेन्शन मिळण्याची हमी

केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आधिकृत निवेदन अथवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. पण असे असले तरी, ट्विटरने नवे आयटी नियम लागू न केल्याने, त्यांचे कायदेशीर संरक्षण अपोआप संपुष्टात आले आहे. आता ट्विटर भारतीय कायद्यांच्या चौकटीत आले आहे. यामुळे त्याला आता कुठल्याही आक्षेपार्ह कंटेन्टसाठी जबाबदार धरले जाऊ शकेल.

नव्या आयटी नियमांनुसार ट्विटरला वैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी 25 मेपर्यंची मुदत देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन आणि इतर कारणे देत ट्विटरने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. ट्विटरने सुरुवातीला काही नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्या सरकारकडून फेटाळून लावण्यात आल्या. ट्विटरने नेमलेले अधिकारी बाहेरील कायदेशीर सल्लागार होते. ते कंपनीशी थेटपणे जोडले गेलेले नव्हते.

सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

राज्यपालांवर निशाणा -राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर निशाना साधताना ममता म्हणाल्या, आम्ही तीन-तीन वेळा पीएम मोदींना पत्र लिहिले आहे. की राज्यपालांना परत बोलवावे. ते अमित शाह यांच्या जवळचे आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालTwitterट्विटर