शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 20:08 IST

केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे.

कोलकाता - ट्विटरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला नियंत्रणात आणण्यात अशस्वी ठरल्यानंतर, आता त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा संबंध आपल्या सरकारशी जोडताना त्या म्हणाल्या, की केंद्र सरकार आपल्या सरकारसोबतही असेच करत आहे. (CM Mamata Banerjee says centre trying to bulldoze twitter as it cant control the microblogging platform)

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘मी याचा निशेध करते. ते ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून त्याला प्रभाव शून्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते (केंद्र) ज्यांना आपल्याकडे वळवू शकत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत असेच वागत आहे. ते मला नियंत्रणात घेऊ शकत नाहीत, यामुळे माझ्या सरकारलाही प्रभाव शून्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

वय वंदना योजना; फक्त एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला पेन्शन मिळण्याची हमी

केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आधिकृत निवेदन अथवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. पण असे असले तरी, ट्विटरने नवे आयटी नियम लागू न केल्याने, त्यांचे कायदेशीर संरक्षण अपोआप संपुष्टात आले आहे. आता ट्विटर भारतीय कायद्यांच्या चौकटीत आले आहे. यामुळे त्याला आता कुठल्याही आक्षेपार्ह कंटेन्टसाठी जबाबदार धरले जाऊ शकेल.

नव्या आयटी नियमांनुसार ट्विटरला वैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी 25 मेपर्यंची मुदत देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन आणि इतर कारणे देत ट्विटरने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. ट्विटरने सुरुवातीला काही नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्या सरकारकडून फेटाळून लावण्यात आल्या. ट्विटरने नेमलेले अधिकारी बाहेरील कायदेशीर सल्लागार होते. ते कंपनीशी थेटपणे जोडले गेलेले नव्हते.

सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

राज्यपालांवर निशाणा -राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर निशाना साधताना ममता म्हणाल्या, आम्ही तीन-तीन वेळा पीएम मोदींना पत्र लिहिले आहे. की राज्यपालांना परत बोलवावे. ते अमित शाह यांच्या जवळचे आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालTwitterट्विटर